त्या आठवणी...

*गेले ते दिवस ,राहील्या त्या आठवणी..........*

*बंबात* तापलेल्या पाण्याची *अंघोळ न्हाणीतली* असायची.
*लाईफबाॅयशिवाय* दुसरी कंपनी माहीती नसायची.
*ok,501* साबणाची वडी कपड्यावर घासायची...
*Moti* साबणाचं कौतुक फक्त *दिवाळीला* असायचं.
*शाम्पू* कुठला लावताय राव, *निरम्यानचं* डोकं धुवायचं...
*दिवाळीच्या* एका ड्रेसवर *वर्षभर* मिरवायचं...
*थोरल्याचं* कापडं धाकट्यानं *झिजेपर्यंत* वापरायचं...
*चहा चपातीची* न्याहरी, *उप्पीट,पोहे* कौतुकाने असायचे,
*पार्ले* बिस्किटाशिवाय चहाला दुसरे जोडीदार  नसायचे...
*गोल* पंक्तीत बसून सगळ्यांनी मिळून जेवायचं...
*खर्डा ,भाकरी,झुणका* पंचपक्वानासारखं लागायचं.
*गोट्या,विटीदांडू,लपाछपी........*
कधी कधी *पत्त्यांचाही* खेळ रंगायचा...
*काचाकवड्या,जिबली* नाहीतर.....
*भातुकलीचा* डाव मांडायचा...
अधून मधून *चिंचा,पेरू,आंब्याची* झाड शोधायचं...
नाहीतर *जिभेला* रंग चढवत *गारेगार* चोखायचं...
*गणगाटाची* बैलगाडी,त्याला त्याचाच *बैल* जुंपायचा...
*शेंगा* चेचून केलेला चिक्की बाॅल दणकट असायचा...
पानं चेचून केलेली *मेंहदी* हातावर खुलायची...
*बाभळीच्या* शेंगाची जोडवी बोटात खुळखुळायची...
*मनोरंजनासाठी* असायची *ब्लॅक अॅन्ड व्हाईट टि.व्ही.*
*शनिवारी हिंदी* आणि *रविवारी मराठी* मुव्ही...
*रामायण,महाभारतं शक्तीमानसाठी* रविवारची वाट बघायची...
*चित्रहार,रंगोली,छायागीत* यातून सलमान,माधूरी भेटायची.....

*शाळेला* तर नियमित जायचं
वायरीचं दप्तर पाठीवर असायचं...
*उरलेल्या* पानांची वही *बायडिंग* करायची...
*निम्म्या* किंमतीत घेतलेली पुस्तकं सोबतीला असायची...
*घासातला घास* शेअर करत डबे सगळ्यांच संपवायचे...
*बाॅटल* कुठली राव...........
*टाकीच्या* नळाला तोंड लावून पाणि प्यायचं...
जमेल तेवढं करत होतो, *टेन्शन* काय नसायचं...
*कारण,* नुसतं पास झालो तरी *आई-बाप* खूष असायचं...
*पावसाळा* आला की पोत्याची गुंची करायची...
*चिखलातनं* वाट काढताना *स्लिपर* त्यात रूतायची...
एकमेकांच हात पकडून मुख्य रस्त्यानच निघायचो...
*रिक्षा,स्कूल बस* नसली तरी घरी व्यवस्थित पोहचायचो.
*दिवसभर* हुंदडून *पेंगत पेंगत* जेवायचं
एकाच *अंथरूनावर* ओळीनं सगळ्यांनी *निजायचं...*
*वाकळंतल्या* ऊबीत झोप मस्त लागायची...
*दिवसभराची* मस्ती रात्री *स्वप्नात* दिसायची...........
*दिवस* पुन्हा उजडायचा *नवी मजामस्ती* घेऊन...
*रात्रीच्या अंधाराला* तिथेच मागे ठेवून...

*संस्मरणीय आठवणी...*

जुगलबंदी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महान फलंदाज, क्रिकेटचा देव म्हणजेच सचिन आणि महान गोलंदाज, फिरकीचा बादशहा शेन वॉर्न यांच्यातलं द्वंद्व,जुगलबंदी प्रत्येकाला माहिती आहे. बहुतांश वेळा सचिनने शेन वॉर्नची धुलाई केलेली आहे. शेन वॉर्नबद्दल सचिनच्या अनेक खेळी गाजलेल्या आहेत. "सचिन कधीकधी पुढे येऊन वॉर्नला आखूड टप्प्याचा चेंडू टाकण्यासाठी भाग पाडायचा. कधीकधी बॅकफूटला जाऊन तो सुरेख फटके खेळायचा. एका प्रकारे हे शेन वॉर्नला आपल्या इशाऱ्यावर नाचवण्यासारखं होतं. शेन वॉर्नच्या गोलंदाजीवर फार कमी फलंदाज मोठे फटके खेळू शकायचे, सचिन त्यापैकी एक होता. सचिनला बाद करण्यासाठी शेन वॉर्न आपल्या शैलीत अनेक बदल करायचा पण यामध्ये त्याला फारसं यश लाभलं नाही." सचिन आणि शेन वॉर्न कसोटी सामन्यात १२ वेळा समोरासमोर आले, यापैकी ३ वेळा सचिन शेन वॉर्नच्या गोलंदाजीवर बाद झाला.
तसेच राजकारणी लोक आणि सर्वसामान्य माणसे जेव्हा आमने सामने तेव्हा काय धमाल उडते वाचा.राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी सायंकाळी पाच वाजता आपल्या 
फेसबुकवरुन ‘आपुलकीचा संवाद’ या नावाने जनतेशी संवाद साधला. पाच वाजता त्यांच्या पेजवरुन फेसबुक लाइव्ह सुरु झाले आणि कमेंटमध्ये इमोन्जी, स्मायली आणि कमेंटचा पाऊस पडू लागला. मुनगंटीवार काय बोलत आहेत याऐवजी ट्रोलर्सने आणि टीकाकारांनी त्यांच्या फेसबुक लाइव्हदरम्यान कमेंट करत त्यांना वेगवेगळ्या विषयांवर जाब विचारण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री मदतनिधीऐवजी पीएम केअर्ससाठी मदत करण्यास का सांगितले जात आहे?, हा प्रश्न अनेकांनी विचारला. तसेच अनेकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बाजू घेत मुनगंटीवार यांना थेट लाइव्हदरम्यान कमेंटमधून प्रश्न विचारले. अनेकांनी खास ग्रामीण भाषेमध्ये मुनगंटीवार आणि भाजपाच्या भूमिकेवर टीका केली. एकीकडे ट्रोलर्स आणि टीकाकर कमेंटच्या माध्यमातून टीका करत असतानाच दुसरीकडे मुनगंटीवार यांनी आपला संवाद सुरुच ठेवला होता. मात्र टीका करणाऱ्या आणि केवळ स्मायली असणाऱ्या कमेंट दीड हजारांहून अधिक झाल्या. त्यानंतर मात्र मुनगंटीवार यांनी संवाद थांबवण्याचा निर्णय घेतला. थोड्या वेळाने मुनगंटीवार यांच्या फेसबुक पेजवरील लाइव्हचा हा रेकॉर्डेड व्हिडिओही डिलीट करण्यात आला.

दूरदर्शन

 मी आलो मी पाहिलं मी लढलो मी जिंकून घेतलं सारं हे हमाल दे धमाल या चित्रपटातील हे अप्रतीम गाणे आपल्या सर्वांचे लाडके लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर चित्रीत झाले होते.विनोदाची उत्तम जाण असलेले प्रसिद्ध नट होते आणि खरंच हे गाणे म्हणजे त्यांच्या जीवनाचा प्रवासपट म्हणावे लागेल.ते आले, त्यांनी पहिले,ते लढले आणि जिंकून घेतलं सारं.अशा या लोकप्रिय नटाला लोकांनी डोक्यावर घेतले.तुम्ही ही घराबाहेर या लॉकडाऊनचा कालावधी संपल्यावर तुमचे स्वागत आहे.तुम्ही ही पहा पण टीव्हीतून न्यूज,मालिका,गाणे,चित्रपट बघा चांगली पुस्तके वाचा.तुम्ही ही लढा बाहेर पडतांना काळजी घ्या अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडा.रोज रोज शतपावली,औषधे,भाजीपाला,दुध,किराणा आणण्यासाठी अशी कारणे देऊन लढायला जाऊ नका.अशी लढाई जिंकून तुम्ही काहीही साध्य करणार नाही अशी हिरोपंती करून लोक तुम्हांला डोक्यावर नाही तर कुठे ठेवतील याचा विचार तुम्ही नक्कीच करा.
   आजच्या काळातंल,आजच्या प्रेक्षकवर्गाला आजचं मनोरंजन पुरवणारं आजचं माध्यम म्हणजे टीव्ही (मालिका)आणि मोबाईल (वेब सीरिज). दूरदर्शनने छोटया पडद्यावरील मालिकाविरांना स्वतः कडे खेचून आणण्यास यशस्वी झाली आहे.मनोरंजनाचं नवीन साधन म्हणून दूरदर्शनने आपली अशी वेगळी ओळख निर्माण केलीय आपल्या चाहत्यांना आपल्याकडे खेचलाय. त्याची काही उदाहरणं द्यायची झाली तर 'रामायण', 'महाभारत', 'शक्तीमान', 'सर्कस' यासारख्या अनेक मालिकांनी हे जूने ते सोने असे दाखवून दिलं.आजच्या काळात सर्वाना सगळं इन्स्टंट हवं असंत.पटकन आमंच मनोरंजन करा पटकन विषय काय तो सांगून संपवा अशी त्यांची मानसिकता असते.मालिकांमध्ये वर्षानुवर्षे एकच दळण दळलं जातं असे म्हटले जात असले तरी या लोकप्रिय मालिकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत घरीच रहा आणि या मनोरंजनाचा लाभ घ्या हा अनमोल संदेश देऊन मोलाची कामगिरी बजावली.एक मात्र नक्की की, हे माध्यम कुणाला आवडो वा न आवडो ते तुमच्या-आमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेलं आहे.दूरचे दर्शन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणारे आपले सगळ्यांचे आवडते एकमेव चॅनल म्हणजे दूरदर्शन.

शब्द काही सूचेना....

खरंच खूपच छान कविता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे डावपेच, डोळ्यात पाणी आणणारे 'श्याम ची आई' पुस्तक,जबरदस्त गाजलेले नाटक 'ती फुलराणी' आणि तुकोबांचे अभंग तसेच विस्फारलेल्या डोळ्यांनी वाचलेले खगोलशास्र चादोबा आणि फास्टर फेणे यांच्याशी झालेली दोस्ती आम्हांलाही आठवतात त्या पुस्तकातल्या गोष्टी...

फास्टफूड की सुपरफूड्स ...

     'सुपरफूड्स' हा शब्द ऐकल्यावर कदाचित वाटेल की हे अन्नपदार्थ आपल्याला सहजपणे उपलब्ध होतील का? आपल्याला परवडतील का? आपल्या जवळपासच्या दुकानामध्ये हे मिळतील का? पण अशी कोणतीही शंका तुमच्या मनात असेल तर ती तुम्ही लगेच काढून टाका काजू बदाम,अक्रोड म्हणजे सुपरफूड्स नव्हे असे अन्नपदार्थ जे आपण पिढयानपिढया खात आलो आहोत.आपल्याच परिसरात सहजपणे पिकणारे, वाढणारे धान्य,कडधान्य,फळे,भाज्या म्हणजेच सुपरफूड्स.
    वजन वाढविण्यासाठी आहारामध्ये कायम प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करायला हवा. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधून शरीराला मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळत असतात. त्यामुळे दूध, पनीर या पदार्थांचा आहार समावेश करायला हवा. त्यासोबतच शेंगा आणि डाळींचाही आहार समावेश करावा.ज्या पदार्थांमधून शरीराला कार्बोहायड्रेट मिळतात त्या पदार्थांचं जास्तीत जास्त सेवन करावं. गहू, ब्राऊन राईस, धान्य यामधून शरीराला मोठ्या प्रमाणावर कार्बोहायड्रेट्स मिळत असतात. त्यासोबतच ताजी फळं, बटाटे, सुकामेवा आणि आंबा यांच्यामुळेदेखील कार्बोहायड्रेट्स वाढण्यास मदत होते.ज्या पदार्थांमध्ये स्निग्ध पदार्थांचा अंश जास्त असतो अशा पदार्थांचा जेवणामध्ये हमखास वापर करावा. त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. सूर्यफुलाचं तेल,मासे या पदार्थांमध्ये स्निग्धांश जास्त प्रमाणात असतात.त्यामुळे वजन लवकर वाढतं.चिकन, फळ, भाज्यान शेंगदाणे आणि पनीर या पदार्थांचा आपल्या आहारात नक्कीच समावेश व्हायला हवा. या पदार्थांचं सेवन केल्यामुळे वजन लवकर वाढतं. त्यामुळे रोजच्या आहारात संपूर्ण धान्य,पास्ता यांचा समावेश करावा.
        फास्टफूड, जंक फूड खाण्यापेक्षा सकस आहारावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. नाश्तामध्ये एक ग्लास दूध, सफरचंद आणि मुठभर शेंगदाणे यांचा समावेश करावा.

एक छोटासा प्रयत्न...

राजकारण हा विषय मलाच काय? कोणालाही न समजणारा विषय आहे तरी या विषयावर नेहमी शांत बसणारे माणसे देखील भरभरून बोलायला लागतात किती प्रेम किती जिव्हाळा असतो त्यांचा या विषयावर राजकारण इतिहासात देखील होते त्यांचे ज्वलंत उदाहरणे म्हणजे रामायण आणि महाभारत.शहाणे लोकांनी कोर्टाची पायरी चढू नयेत असे म्हणतात तसेच राजकारणावर बोलू काही त्यापेक्षा शांतपणे बसणे केव्हाही योग्यच म्हणावे लागेल.
न्यूज चॅनलवाले मात्र आपले काम व्यवस्थित करत आहेत याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत.श्रीमंत लोकांनाकडून लॉक डाऊन काळात कोणाकडून किती देणगी मिळाली किंवा लॉकडाऊन असताना श्रीमंत लोक घरात काय करतात? तसेच गरीब लोक कसे जगतात त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते आणि सरकार त्यांना कोणत्या पद्धतीने मदत करते याबद्दल न्यूज चॅनलवाले जीव मुठीत धरून पुढाकार घेतांना दिसत असले तरी मध्यमवर्गी लोकांचे काय? त्यांच्याकडे तर सरकारचे दुर्लक्षच आहे.निदान न्यूज चॅनलवाल्यांनी तरी लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
लॉकडाऊन मुळे आरोग्य,उदयोगधंदे,नोकरी आणि आपली अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. लॉकडाऊन मुळे एक गोष्ट चांगली झाली ती या कालावधीत ध्वनी,जल आणि वायू प्रदूषणात घट झाली आहे त्याचाच परिणाम म्हणजे जंगलात राहणारे पक्षी,प्राणी आपल्या मानवी वस्तीत दिसून येत आहे.कधीही न दिसणारे समुद्री जीव आणि मासे समुद्रात आणि खाडीत दिसू लागले आहेत. असे म्हणतात 'कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है' बरोबरच आहे.

मराठी पाऊल पडते पुढे...

    टीव्हीला छोटा पडदा म्हणण्याचे दिवस आता गेले. आता हाच छोटा पडदा मोठा झाला आहे आणि बॉलिवूडलाही टक्करही देत आहे. टीव्ही कलाकार आता बॉलिवूडकरांपेक्षा जास्त मानधन घेत आहेत. मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची काम करण्याची पद्धतही वेगळी असते. अनेक शिफ्ट्समध्ये त्यांना काम करावं लागतं. मालिकेमधील एक व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अनेक महिने, वर्षे लागतात. टीव्हीवरील असाच एक नावाजलेला चेहरा म्हणजे अभिनेते शिवाजी साटम.
      सोनी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कार्यक्रम 'सीआयडी'मध्ये अभिनेते शिवाजी साटम यांनी एसीपी प्रद्युम्न ही भूमिका साकारली. साटम सीआयडीच्या भागांसाठी महिन्यातून फक्त १५ दिवस काम करत. सीआयडीच्या टीमचे ते फार जुने सहकारी आहेत. साटम यांनी अभिनयाच्या जोरावर एसीपी प्रद्युम्न ही व्यक्तिरेखा अजरामर केली आहे.‘कुछ तो गडबड है’ हा संवाद ऐकला की आजही डोळ्यासमोर शिवाजी साटम यांचाच चेहरा येतो.पण तुम्हाला हे माहिती आहे का, की ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी शिवाजी साटम किती मानधन घ्यायचे? ‘जनसत्ता डॉट कॉम’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, शिवाजी साटम एका एपिसोडसाठी साधारणपणे १ लाख रुपये घ्यायचे. ते या कार्यक्रमासाठी महिन्यातले १५ दिवस काम करत तर उर्वरीत दिवसांत ते सिनेमांचे चित्रीकरण करत असत. शिवाजी साटम यांच्या करिअरची सुरूवात टेलिव्हिजनपासूनच झाली होती. यानंतर त्यांना अनेक सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या. आतापर्यंत त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. 

शो मस्ट गो ऑन...

 मुंबई ही भारतातल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. मुंबई हे भारतातील व दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या
उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभले असून या बंदरातून भारताची सागरी मार्गाने होणारी ५०% मालवाहतूक होते.भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. रिझर्व बॅंक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहरात आहेत. अनेक कम्पन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक येतात.
    मुंबई हे बॉलीवूड व मराठी उद्योगाचे केन्द्र आहे. बोरीवली नॅशनल पार्क किंवा कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या हद्दीतच आहे.अशी ही आमची मुंबई आमच्या मुंबईला मायावि नगरी सुध्दा म्हटले जाते.असे म्हणतात मुंबईत कोणीही उपाशी झोपत नाही.
मुंबईसारख्या महानगरामध्ये, ठाणे, नवी मुंबई, पुणे अशा शहरांमध्ये परप्रांतीयांच्या वाढत्या संख्येवरून नेहमीच हवा तापवली जाते. पण आज या ठिकाणी दूध - पेपर टाकणारे, इस्त्री करणारे, भाज्या, फळांची विक्री करणारे, अँपवरून ऑर्डर दिल्यावर अन्न पदार्थ आणून देणारे, ऑनलाइन खरेदी केल्यावर त्या वस्तू घरपोच आणून देणारे, सिक्युरिटी गार्ड, घरकाम करणाऱ्या स्त्रिया, ओला - उबर गाड्या चालवणारे ड्रायव्हर, वेगवेगळ्या गोदामांमध्ये मालाची चढ उतार करणारे हमाल, बांधकाम मजूर अशी अनेक प्रकारची कामं करणारे परप्रांतीय जिवाच्या भीतीने आपापल्या गावी परतले आहेत.
  लॉक डाऊन जेव्हा केव्हा संपेल तेव्हा ही सगळी माणसं लगेचच परततील का याविषयी आज तरी कुणीही काहीही सांगू शकत नाही. खरं म्हणजे जीवाच्या भीतीने शहरातून आपापल्या माणसांमध्ये निघून गेलेली ही मंडळी लगेचच परतण्याची शक्यता तशी कमीच आहे या मंडळींच्या नसण्यामुळे देखील शहरामधलं जनजीवन आज जरी ठप्प झाले असले तरी लॉकडाउन संपल्या नंतर जनजीवन पुन्हा मार्गी लागेल याबद्दल शंकाच नाही परप्रांतीय यांच्या जाण्याने सगळं ठप्प होईल हा समज असेल तर हा गैरसमज आधी दूर करा मुंबई ही आमची देखील आहे असे ठामपणे सांगणारे परप्रांतीय मुंबईवर कोरोनाचे संकट येताच आपल्या गावी जाण्यासाठी विनंती करू लागले आहे. मुख्यमंत्री यांनी तुम्ही खबरदारी घ्या मी तुमची जवाबदारी घेतो असे सांगूनही ते येथून पळ काढत आहे कोणी चालत कोणी दुधगाडीच्या साहाय्याने आपल्या गावी जाण्यासाठी प्रयत्न करत आहे.
       मुंबईवर पहिल्यांदा काय संकट येत नाही याआधीही 26/11 आणि 26 जुलै ही संकटे आली होतीच पण यावर मुंबईने मात केली ज्या मुंबई स्थानकाचे नावच छत्रपती शिवाजी महाराज आहे. महाराजांनी औरंगजेबला सळो की पळो करून सोडले त्या ठिकाणी कोरोना विषाणू काहीच नाही या विषाणूवर आपण नक्कीच मात करू लंकापती रावणाचा सर्वनाश झाला प्रभु श्रीरामचंद्राच्या वनवासामुळे,महाराज कंस चा मृत्यू झाला श्रीकृष्णाच्या कारावासामुळे तसाच कोरोना विषाणू देखील नष्ट होईल तुमच्या गृहवासाने म्हणजेच तुमच्या घरीच राहण्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा.मुंबईमध्ये प्लेग,चिकन गुनीया आणि डेंगुची साथ आली पण मुंबई कधीच थांबली नाही जीवन चलनेका नाम चलते रहो सुबह शाम हे प्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार यांच्या चित्रपटातील हे लोकप्रिय गाणे अजूनही आमच्या मुंबईला लक्षात आहे.कोणाच्या येण्याने आणि जाण्याने ही मुंबई कधीही थांबली नाही आणि कधीच थांबणार नाही आमची मुंबई आणि आम्ही फक्त एकच लक्षात ठेवतो की शो मस्ट गो ऑन.

संधी की सुर्वणसंधी

  गेला आठवडाभर शेअर बाजारात मंदी आहे. देशांतर्गत आर्थिक स्थिती नाजूक असतानाच करोना विषाणूची बाधा शेअर बाजारालाही झाल्याने गुंतवणूकदारांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु अनेक उत्तम कंपन्यांचे शेअर्स पुन्हा एकदा आकर्षक भावात उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने या संधीचा फायदा घेता येईल. मात्र नवीन खरेदी अथवा विक्रीही टप्प्याटप्प्याने केली जावी.काही गुंतवणूकदारांची परिस्थिती ही किनाऱ्याजवळ गळ टाकून बसलेल्या व्यक्तीसारखी असते. मासे तर पकडायचे असतात पण खोल पाण्यात जायचे नसते. यांची अपेक्षा असते की, एखादा मासा किनाऱ्याजवळ येईल आणि गळाला लागेल. तर असे गुंतवणूकदार जेव्हा एखादा शेअर घेतात तो किंमत कमी म्हणून घेतात आणि कधी तरी तो वाढेल या भावनेने त्याला वर्षांनुवर्षे ठेवतात. अशा भावनेने घेतलेला शेअर कालांतराने मोठी कमाई करून देऊ शकतो असाच एक शेअर मी तुमच्या साठी माझी गुंतवणूक या पोस्टमधून घेऊन आलो आहे.
   सुमारे ११० वर्षांपूर्वी इम्पेरियल टोबॅको कंपनी या नावाने स्थापन झालेली आयटीसी ही देशातील एक अग्रगण्य एफएमसीजी मार्केटर आहे. सुरुवातीला केवळ तंबाखू आणि सिगारेट उत्पादनात असलेली आयटीसी आज पेपरबोर्ड आणि पॅकेजिंग उद्योगासह कृषी, हॉटेल्स, बिस्किट्स, रेडी टू इट, साबण, माहिती तंत्रज्ञान, पर्यटन तसेच तयार कपडे अशा अनेकविध क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी असून तिची भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून देखील ओळख आहे. आयटीसीची संपूर्ण मालकीची उपकंपनी आयटीसी इन्फोटेक ही एक विशेष जागतिक डिजिटल सोल्यूशन्स प्रदाता आहे. कंपनी लवकरच डेअरी उत्पादनातदेखील पदार्पण करणार आहे. कंपनीकडे सुमारे २६,००० कर्मचारी कार्यरत आहेत.गेल्या दशकात, आयटीसीच्या नवीन कंझ्युमर गुड्स बिझिनेसजने जागतिक स्तरावरील भारतीय ब्रँडचा एक उत्तम पोर्टफोलिओ स्थापित केला आहे. आशीर्वाद, सनफिस्ट, यिप्पी!, बिंगो!, बी नॅचरल, आयटीसी मास्टर शेफ, फॅबेल, सनबिन, फिआमा, एंगेज, विव्हेल, सॅव्हलॉन, क्लासमेट, पेपरक्राफ्ट, मंगलदीप इ. अनेकविध लोकप्रिय ब्रँड्सनी अल्पावधीतच आयटीसीला मोठय़ा एफएमसीजी कंपनीचे स्थान मिळवून दिले आहे. विल्स, गोल्ड फ्लेक आणि ५५५ हे सिगारेट उत्पादनातील प्रमुख ब्रॅंड आहेत. डिसेंबर २०१९ अखेर संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने अपेक्षित कामगिरी करून दाखवली आहे.इतर क्षेत्रांच्या तुलनेत आयटीसीसारखा शेअर तुमच्या पोर्टफोलियोला नक्कीच भक्कम आधार देईल.
     संपूर्ण भारत करोनाशी लढत असताना आयटीसीने सामाजिक भान ठेवून १५० कोटी रूपयांचा विशेष फंड स्थापन केला आहे. तसेच सॅव्हलॉन सॅनिटायजर्सची किंमत देखील ७७ रुपयावरुन केवळ २७ रुपयांवर आणली आहे. आयटीसीने आपल्या गुंतवणूकदारांना कायमच भरभरून दिले आहे. आगामी कालावधीतही कंपनी आपल्या भागधारकांना खूष ठेवेल यांत शंका नाही.सध्याच्या बाजारात अगदी बऱ्याच अनुभवी गुंतवणूकदारांना सुद्धा काय घेऊ आणि काय नको असे होऊन गेले असेल. सध्या जागतिक परिस्थिती मात्र स्तब्ध आणि एका जागी खिळली आहे. करोनाचे परिणाम हे दूरगामी असल्याने बिघडलेली आर्थिक घडी पुन्हा बसायला नक्की किती काळ जावा लागेल याचा केवळ अंदाजच बांधला जाऊ शकतो. 
सुचविले शेअर्स कृपया माहितीसाठी असून प्रत्यक्ष गुंतवणूक करतांना त्या क्षेत्रातील अनुभवी लोकांनाकडून सल्ला घ्या ही विनंती आहे.

आरोग्यधन संपदा - हेल्थ आणि वेल्थ

*आरोग्य म्हणी*

१. खाल दररोज गाजर-मुळे,
    तर होतील सुंदर तुमचे डोळे.

२. सकाळी नाश्ता करावा मस्त,
    मोड आलेले धान्य करावे
    फस्त.

३. डाळी भाजीचे करावे सूप,
    अखंड राहील सुंदर रूप.

४. तरोट्याच्या भाजीला म्हणू
    नका स्वस्त,
    आरोग्य तुमचे ती राखेल मस्त.

५. जवळ करा लिंबू संत्री, 
    दूर होईल पोटातील वाजंत्री.

६. पपई लागते गोड गोड,
    पचनशक्तीला नाही तोड.

७.पालेभाज्या घ्या मुखी;
   आरोग्य ठेवा सदा सुखी.

८. भेसळयुक्त अन्न खाऊ नका;
    आरोग्य धोक्यात आणू नका.

९. दररोज एक फळ खावू या;
    आरोग्याचे संवर्धन करु या.

१०. भोजनोत्तर फळांचा ग्रास;
       थांबवेल आरोग्याचा ऱ्हास.

११. प्रथिने, जीवनसत्वे आणि
      क्षार; 
     आहारात यांचे महत्व फार.

१२. हिरवा भाजीपाला खावा
       रोज; 
       राहील निरोगी आरोग्याची
       मौज.

१३. जेवणा नंतर केळी खा; 
       पचनशक्तीला वाव द्या.

१४. साखर व तूप यांचे अती
       सेवन करु नका,
       मधुमेह व लठ्ठपणाला
      आमंत्रण देऊ नका.

१५. खावी रोज रसरशीत फळे; 
       सौंदर्यवृद्धीसाठी नको
       प्रसाधन वेगळे.

१६. गालावर खेळते सदा हास्य, 
       फळे व भाज्यांचे आहे ते
       रहस्य.

१७. पपई, गाजर खाऊ स्वस्त, 
       डोळ्यांचे आरोग्य ठेवू मस्त.

१८. सुका मेवा ज्यांचे घरी, 
       प्रथिने तेथे वास करी.

१९. भाज्या जास्त वेळ शिजवू
       नका, 
       जीवनसत्वांचा नाश करु
       नका.

२०. जो घेईल सकस आहार,
       दूर पळतील सारे आजार.

२१. भाजीपाल्याचं एकच महत्व, 
       स्वस्तात मिळेल भरपूर
       सत्व.

२२. शेंगेत शेंग, शेवग्याची शेंग,
       तिचा पाला, तीच अंग, सत्व
       आहे तिच्या संग.

२३. कळणा कोंडा खावी नाचणी,
       मजबूत हाडे कांबीवाणी.

२४. आरोग्य म्हणींचे हे उपयोगी 
       सत्र;
       अंमलात आणाल तर रहाल
       कायमचे निरोगी मात्र.

*चला निरोगी राहु, आनंदी राहु...*

दोन शब्दाची जादू...

कोरोनामुळे  असलेल्या लॉकडाउन दरम्यान अशाप्रकारांचे प्रमाण वाढले आहे. अफवा व खोट्या बातम्या पेरुन भीती व द्वेष पसरविण्याच्या काही विघ्नसंतोषी लोक समाज माध्यमांचा दुरुपयोग करून सामाजिक व धार्मिक तेढ, दुही निर्माण करण्याचा, समाजात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत.कृपया असे काहीतरी करू नका जेणेकरून तुम्ही अडचणीत याल काळजी घ्या. पोस्ट करतांना विचार करा.कोणतीही पोस्ट आली की फॉरवर्ड करू नका.पोस्ट आधी वाचा,विचार करा आणि मगच पोस्ट करा. फक्त दोन शब्दाची जादू आहे एक म्हणजे प्लीज आणि दुसरा शब्द म्हणजे थॅक्यू.
                        प्रसंग पहिला
एका वर्गात शिक्षकांनी विचारले: "प्रेमाचे जगातील सर्वश्रेष्ठ प्रतीक कोणते ?"
बहुतेक सर्व विद्यार्थ्यांनी एका सुरात उत्तर दिले: "ताजमहाल"फक्त एक विध्यार्थी म्हणाला "रामसेतू" !शिक्षकांनी विचारले: "कसे ?"
विध्यार्थी म्हणाला "रामसेतू प्रभू श्रीरामांनी आपल्या पत्नीला पुन्हा आणण्यासाठी बांधला आणि तो सेतू बांधायचे काम झाल्यावर त्यांनी स्वार्थीपणे  बांधकाम करणाऱ्या वानरांचे हात नाही कापले तर, तर त्यां सर्वांना आपल्या बरोबर प्रेमाने अयोध्येला घेऊन गेले आणि आपल्या राज्यात मानाचे स्थान दिले" त्याच्या या उत्तराने  शिक्षक आणि इतर विद्यार्थी सुन्न झाले आपण आपल्या इतिहास आणि पौराणिक वाङमयाकडे नव्या दृष्टीने पहायची गरज आहे ....! खरंच आता आपल्याला बदल घडविण्याची गरज आहे कारण बदल हा सृष्टीचा नियम आहे.अशा काही पोस्ट असतील तर फॉरवर्ड करा.
        सध्या करोनाचा सामना सगळं जग करतं आहे. आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि इतर सगळ्या कर्मचाऱ्यांचं योगदान अनन्यसाधारण आहे. दिवस-रात्र एक करुन आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी करोनाच्या संकट अधिक पसरू नये यासाठी काम करताना दिसत आहे. अनेक देशांमध्ये तर रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना करोना झाल्याची उदाहरणेही आहेत. असं असतानाही डॉक्टर आणि नर्सेस त्यांचे कर्तव्य पार पडताना दिसत आहेत. डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्चमाऱ्यांच्या याच निस्वार्थ वृत्तीला गुगलने डूडलच्या माध्यमातून अनोखा सलाम केला आहे. गुगलने याआधीही डूडलच्या माध्यमातून अनेकांना मानवंदना देऊन आभार प्रकट केले आहे. याबद्दल गुगलचे खूप खूप अभिनंदन गुगलबद्दल काय लिहावे जितके लिहावे तितके कमीच आहे मी सर्वप्रथम गुगलचे आभार मानतो त्यांच्यामुळे मला आज BLOG लिहिण्याची
सुर्वणसंधी मिळाली.किंवा थॅक्यू म्हणणारे संदेश पाठवा.
                         प्रसंग दुसरा
    तिकडे तिचा पारा चढलेला ...तोंडाचा पट्टा सुरु ... आणि बोलता बोलता तिने फ्रीझ उघडला ...पिवळ्या प्रकाशातून बाहेर डोकावत ती तिथूनच ओरडली .. मटकी आहे ... मिसळ करू ... ? तो एव्हाना किचनच्या दारात आलेला ...डोळ्यात चमक ... चालेल  ... पण तिखट कर हां...तिने फणकाऱ्याने मटकीचं भांडं बाहेर काढलं आणि जोरातच म्हणली... हो, मी शिरते आता त्यात तसा तो उत्स्फूर्तपणे म्हणाला ... 
अगं .. गोड होईल मग ती...आता तिचा हात थांबला... तिने त्याच्याकडे पाहिलं...
मटकी गॅसवर चढेपर्यंत राग पूर्ण ओसरलेला...
आणि गालावर एव्हाना लाजेची खळी फुटलेली ...तात्पर्य काय ... संसारात योग्य वेळी योग्य शब्दांची फुंकर घालता यायला हवी... म्हणजे मग भांडण फार वेळ धगधगत रहात नाही ..अजून  आपल्याला घरीच रहायचे आहे, तेंव्हा भांडु नका. प्लीज असे संदेश फॉरवर्ड करायला काहीच हरकत नाही.आणि थॅक्यू हे वाचन केल्याबद्दल.

एक नाणे आणि दोन बाजू...

महाराष्ट्राची चिंता वाढवणारी ही बातमी आहे. कारण महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतेच आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रातला लॉकडाउन हा ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. अशा सगळ्या परिस्थितीत नागरिकांना लॉकडाउनच्या नियमांचं काटेकोर पालन केलं नाही तर हा कालावधी वाढूही शकतो. तेव्हा काळजी घ्या आणि कृपया आपल्या घरातच रहा कारण लॉकडाउन वाढविणे किंवा कमी करणे हे आपल्याच हातात आहे हे नेहमी लक्षात ठेवा.आपण स्वतः घरातच लॉक होऊन कोरोनाला डाउन करणे म्हणजेच  लॉकडाउन. एकीकडे करोनाबाधित रुग्ण वाढत असतानाच दुसरीकडे ‘सारी’ आजाराचेही (सिव्हिअर अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स) सावट निर्माण झाले आहे.  विदर्भात सारीचे सुमारे साडेतीनशे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागातील कर्मचारी हवालदील झाले आहे.
          कोरोनाने शेअर बाजरात धुमाकूळ घातला २० जानेवारीला मुंबई शेअर बाजार निर्देशांकावर ४२,२७३ चा उच्चांक मारत १३ मार्चला विक्रीचे दहा टक्क्यांचे खालचे सर्किट लागत २९,३८८ चा नीचांक नोंदविला गेला. बरोबरीने निफ्टी निर्देशांकाने १२,४३० च्या उच्चांकावरून ८,५५५ चा नीचांक नोंदवला. उच्चांकापासून ३० टक्क्यांची घसरण ही कामकाज झालेल्या अवघ्या ४० दिवसांच्या आत कुठेही उसंत, भरीव सुधारणा न होता अल्पावधीत घडली, जे मोठय़ा चिंतेचे कारण आहे. कोरोनामुळे देशात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सगळ्यानाच घरात बसून राहावं लागतं आहे. लॉकडाउनच्या या काळात अनेक वेगळ्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत. महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांबरोबरच बाल लैंगिक शोषणाच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. चाईल्डलाईन इंडिया हेल्पलाईनकडे ११ दिवसांच्या काळात तब्बल ९२००० तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे घरातच बालकांना शोषणाचा सामना करावा लागत आहे.
          एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात चांगली आणि वाईट बाजू आत्तापर्यंत आपण वाईट बाजूबद्दल लिहिले पण चांगल्या बाजूबद्दल लिहिणे महत्वाचे आहे.समतोल राखणे गरजेचे आहे.25 मार्च ते 14 एप्रिल 2020 म्हणजे 21 दिवसाचा लॉकडाउन आज संपला आणि आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देखील आहे.टाळेबंदीमुळे वाहनांची वर्दळ थांबली असून त्यामुळे (जल,वायू,ध्वनी) प्रदूषण व आवाज, लोकांचा अवाजवी संचार पूर्णपणे थांबलेला आहे. असे यापूर्वी कधीही घडले नसल्याने मानव वसाहतींजवळ चिमणी, कावळा, बुलबुल, राखी वटवटय़ा, शिंजीर, तांबट, भांगपाडी मैना, साळुंकी, कोकीळ, चिरक या पक्ष्यांची संख्या पूर्वीपेक्षा खूप वाढली आहे. पूर्वी हे पक्षी हे शेतशिवारात गेले होते. ते आता पुन्हा घराजवळ परतले आहेत. ग्रामीण भागातही चिमण्यांची संख्या पूर्वीपेक्षा वाढली असून शहरी भागामध्येही जिथे चिमण्या अजिबात दिसत नव्हत्या, आता थोडय़ाफार प्रमाणात चिमण्या दिसू लागल्या आहेत. कावळ्यांच्या वाढत्या संख्येबरोबरच जंगली कावळेही दिसू लागले आहेत.हळद्या, निळा कस्तुर, कृष्णथिरथिरा, निखार व नीलिमा हे क्वचितच आढळणारे पक्षी आता अंगणात अधूनमधून सातत्याने हजेरी लावत आहेत, असेही दिसून आले. २१ दिवसांत पुन्हा मानवी वस्तीजवळ परतून आले आहेत. एवढेच नव्हे तर परदेशी पाहुण्या पक्ष्यांचाही मुक्काम वाढला आहे. त्यामुळे आता पक्ष्यांच्या किलबिलाटाने पुन्हा दिवसाची सुरुवात होऊ लागली आहे.

थोडक्यात पण महत्वाचे...

हा विषाणू घरगुती जंतुनाशके आणि विरंजक पदार्थ (ब्लीच) वापरून, किंवा साबण व पाण्याने सतत हात धुण्याने मारला जाऊ शकतो, असे हाँगकाँग विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे. कोविड-१९ विषाणू स्टेनलेस स्टील व प्लास्टिकच्या पृष्ठभागांवर ४ दिवसांपर्यंत, तर फेस मास्कच्या बाहेरच्या स्तरावर एका आठवडय़ापर्यंत चिकटून राहू शकतो
हा विषाणू सामान्य तापमानात निरनिराळ्या पृष्ठभागांवर किती काळपर्यंत संसर्गक्षम राहू शकतो याची संशोधकांनी चाचणी केली. छापील कागद व टिश्यू पेपरवर तो ३ तासांपेक्षा कमी वेळ टिकला, तर प्रक्रिया केलेले लाकूड व कापडावरून तो दुसऱ्या दिवसापर्यंत नाहीसा झाला. काच आणि चलनी नोटा यांवर तो दुसऱ्या दिवशीही दिसत होता, मात्र चौथ्या दिवशी तो नाहीसा झाला. मात्र, स्टेनलेस स्टील व प्लास्टिक यांवर तो ४ ते ७ दिवसांपर्यंत जिवंत होता.
धक्कादायक बाब म्हणजे, वैद्यकीय उपयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या फेस मास्कच्या बाहेरील स्तरावर हा विषाणू ७ दिवसांनंतरही संसर्गक्षम असल्याचे दिसले. त्यामुळेच, सर्जिकल मास्क वापरताना तुम्ही त्याच्या बाहेरच्या बाजूला स्पर्श न करणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे या संशोधकांनी सांगितले.मी घरीच राहणार आणि कोरोनाला भारतातून घालवणार. आहारात पातळ पदार्थ म्हणजे डाळीचे पातळ पाणी, लिंबू सरबत, ताक, फळांचा रस, संत्री व द्राक्षाचा रस याला महत्त्व होते. तसेच जेवणात मोड आलेले कडधान्य, भाजीपाला, दही, दूध, तूप ,भात, भाकरी, चपाती याचा समावेश होता. त्याचबरोबर संत्री, द्राक्ष तसेच अन्य फळे देण्यात आली. या आहारामुळे रुग्णाची प्रतिकार क्षमता वाढण्यास मदतआहार, आराम, जीवनसत्त्व युक्त औषधे व समुपदेशन या त्रिसूत्रीमुळे अहवाल नकारात्मक येण्यास मदत झाली आहे.

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...