लक्ष असू द्या

कोकणाची मुंबई होऊ देऊ नका,...
जास्त पैशासाठी आपल्या जमिनी परप्रांतीयाना विकु नका..
  आपल्या गावी कोणत्याही भाषेचे, जातीचे, धर्माचे लोक आली, तर त्यांची उठाबस करायची, त्यांना काय हवे नको ते पाहायचे, पण त्यांच्या गोड स्वभावाला किंवा पैशाला बळी पडून त्यांना आपल्या गावातील भूमी विकाची नाही.
त्याबद्दल जागरूक रहा, " येवा कोकण आपलाच असा " बोलत बसू नका. आपलं गांव तरी आपल्या ताब्यात ठेवा, गाव म्हणजे फक्त आपल्या घरची मंडळी आणि
घरापुढचे अंगण आणि गाडी पार्किंग ची जागा नाही, गांव म्हणजे गावांत राहणारी आपली सर्व माणसे, आपली भाषा आपले राज्य आपले देव आपली देवळं,आपल्या शेती.
कोकण मध्ये दुहेरी रेल्वे मार्गासाठी परवानगी मिळाली आहे, त्यामुळे अजून परप्रांतीय लोंढे आपल्या गावी येऊन भूमी विकत घेणाच्या विचारात असतील, आपल्या भूमी आपल्याच मराठी माणसाला विका. नाही तर उद्या तुमच्या नातवाला तुमचं गांव म्हणजे मुंबईच वाटायची.
लक्ष असू दया...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

बॅड पॅच

त्या आठवणी...

मनातलं मन...

सहज सुचली म्हणून....

एक छोटासा प्रयत्न

तूच तुझी वैरी