अल्बम

तणावमुक्त जगण्यासाठी रोज किमान दोन तास स्मार्टफोन, संगणक, दूरचित्रवाणी यांसारख्या पडद्यांपासून लांब राहा; थोडक्यात कायतर ‘डिजिटल पथ्या’चे पालन करा. त्याऐवजी वाचन, छंद, संगीत,लेखन यांपैकी एखाद्या गोष्टीत मन गुंतवा तेवढाच बदल असे म्हणतात बदल हा सृष्टीचा,निसर्गाचा नियम आहे. व. पु. काळे यांनी देखील म्हटले आहे आपल्या वयाला हरवायचे असेल तर आपल्यातील छंद जिवंत ठेवायला पाहिजे. असाच माझा एक छंद म्हणजे पुस्तक वाचन जुनी पुस्तक चाळता चाळता मला लोकसत्ता वृत्तपत्राने प्रकाशीत केलेले " लोकसत्ता अर्थब्रह्म" दिसले. पुर्वी डिग्रीला असताना वाचलेली. पण अनुभव सारखे नव्हते. पहिल्यावेळी वाचतानाचा अनुभव आणि यावेळी वाचतानाचा अनुभव काही वेगळाच होता. पहिल्या वेळी वाचताना आपण कुठलं रटाळ पुस्तक वाचतोय असं वाटतं होतं... तेंव्हा येवढी समज नव्हती किंबहूना आयुष्यातली पहिले पुस्तक असल्यामुळं असेलही कदाचित म्हणजे पुस्तक तेचं पण अनुभव मात्र वेगळा. मुखपृष्ठावरील चित्रे पाहूनच मी पुस्तक विकत घेतले होते.त्यांचा याआधीही 'लोकप्रभा' हा विशेषांक प्रसिद्ध झालेला आहे.आणि त्यास वाचक प्रतिसाद...