फक्त दोनच.......
![इमेज](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhj-E_lGL9ihVesF2lXIuPj0U5gDCI4jGwiz5TCfT6iFj3pOvp9135KxHyXHsCdoSO8M0JHNh0ullVuMH9a0zT5g8L5Gu7o5JUmvGVKf3YIr2N_CpuB2WiWjcb68MT6pZ4xdDPmK7SjYIw/s640/images-8.jpeg)
सिनेमांची कमाई आता 100 कोटींवरून 200 कोटींवर झेपावणार असल्याच्या कितीही बाता बॉलिवूडकरांकडून मारल्या जात असल्या, तरी त्या पोकळ ठरल्याचं दिसून येतंय यंदाच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या सुमारे 80 हिंदी चित्रपटांपैकी जेमतेम 2 चित्रपटांना 100 कोटींचा आकडा गाठता आलाय. प्रेक्षकांची पसंती आशयघन सिनेमांना जास्त मिळते. सिनेमातून दिल्या जाणा-या संदेशावर लोकांचं लक्ष आहे. यावर्षांची सुरुवातच अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर असे दोन तगडे स्टार असलेल्या 'वझीर' ने झाली खरी पण हा चित्रपट चालला नाही. अक्षय कुमारच्या 'एअरलिफ्ट' नं आशयाच्या जोरावर 128 कोटीचा बिझनेस केला. त्याच्यानंतर मात्र शाहरूखचा 'फॅन' प्रियांका चोप्राचा 'जय गंगाजल' सोनम कपूरचा 'नीरजा' हे चित्रपट पोटापुरता गल्ला जमवत एक्झिट घेतली.पण अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'हाऊसफुल्ल 3' या मल्टीस्टारर चित्रपटानं 106 कोटींचा आकडा पार केला.