स्वाक्षरीबद्दल बोलू काही....

"स्वाक्षरी" म्हणजे सहीबद्दल थोडी माहिती
जी व्यक्ती स्वाक्षरी करताना पहिले अक्षर थोडे मोठे काढते ती विलक्षण प्रतिभावंत असते. असे लोक हाती घेतलेले कार्य विलक्षण पद्धतीने पूर्ण करतात. पहिले अक्षर मोठे काढून त्यानंतरची अक्षरे लहान लहान आणि सुंदर असल्यास ती व्यक्ती हळूहळू आपल्या मुक्कामाला पोहोचते. अशी स्वाक्षरी करणाऱ्या लोकांना अधिक सुख-सुविधा प्राप्त होतात.
जी व्यक्ती किचकट, अधिक गुंतागुतीची स्वाक्षरी करतात ते त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जात असतात. या लोकांना सुखी जीवन मिळणे कठीण असते. परिस्थितीमुळे हे लोक काही जणांना फसवतात देखील. अशा व्यक्तींमध्ये यशस्वी होण्याची इच्छा असते, मात्र त्यासाठी प्रयत्न करण्यास या व्यक्ती कमी पडतात. मात्र या व्यक्तींना कुणी दगा देऊ शकत नाही कारण हे चतुर असतात.
काही लोकं आपल्या सहीला अर्धवट किंवा तोडून तोडून लिहीतात. हस्ताक्षराचे शब्द हे छोटे असून ते अस्पष्ट देखील असतात.
त्यामुळे असे हस्ताक्षर ओळखणे थोडे कठीण होते. असे लोक सहसा धुर्त असतात. हे लोक आपल्या कामाचं सिक्रेट कुणासमोर बोलत नाहीत. कधी कधी हे लोक चुकीच्या रस्त्यांवर जाऊन कुणाचंही नुकसान करु शकतात.
जे लोक कलात्मक आणि आकर्षक सही करतात ते रचनात्मक स्वभावाचे असतात. कोणतेही काम कलात्मक स्वरूपात करण्याकडे त्यांचा अधिक कल असतो. अशी सही करणाऱ्या व्यक्ती बहुदा कलाकार असतात. 
काही लोक सहीच्या खाली दोन रेषा ओढतात. अशी सही करणाऱ्या लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिक असते. असे लोक कोणतेही काम करताना अयशस्वी होण्यावरून चिंतेत असतात. खर्च करण्यामध्ये या लोकांचा हात आकडता असतो. अर्थात या लोकांना आपण कंजूस म्हणू शकतो.
जे लोक सहीतील पहिले अक्षर मोठे आणि त्यानंतर आपले शेवटचे नाव म्हणजे आडनाव पूर्ण लिहीतात ते खूप यशस्वी होऊन जीवनात सुख सुविधा प्राप्त करतात. ईश्वरावर विश्वास ठेवणारे आणि धार्मिक कार्य करणे हा त्यांचा स्वभाव असतो.
ज्या व्यक्तींच्या सहीमध्ये लयबद्धता आढळत नाही त्या व्यक्ती मानसिक दृष्ट्या अस्थिर असतात.
ज्या व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या मध्येच कापल्या सारख्या दिसतात त्या व्यक्ती नकारात्मक विचारांच्या असल्याचे स्पष्ट होते. यांना कोणत्याहीब कार्यात सर्वात प्रथम असफलता दिसते.
काही व्यक्तींचे अक्षर आणि त्यांची स्वाक्षरी हे एक सारखेच असते अशा व्यक्ती त्यांची सगळी कामं चांगल्या प्रकारे करतात. अशा व्यक्ती संतुलित असतात. समोर एक स्वभाव आणि प्रत्यक्षात वेगळा अशा स्वरूपाचे नसतात. ज्या स्वभावाचे असतात त्या स्वभावाचेच ते कायम राहतात.
जी व्यक्ती स्वाक्षरीला लिहीताना खालून वर घेऊन जातात ते लोक आशावादी असतात. निराशा ही त्यांच्या स्वभावातच नसते. अशा लोकांचा देवावर अधिक विश्वास असतो. या लोकांना आयुष्यात प्रगती करायची असते. अशी स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्ती चांगलं प्रतिनिधीत्व करू शकतात.....!!!
या माहितीत बऱ्यापैकी तथ्य आढळेल !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

अभिनंदन केले पाहिजे

बॅड पॅच

मनातलं मन...

एक छोटासा प्रयत्न

तूच तुझी वैरी

सहज सुचली म्हणून....