रामायण-महाभारताची गोडी...

'रामायण' आणि 'महाभारत' ही महाकाव्ये भारतीय समाजात पिढ्यानपिढ्या वाचली जात आहेत.मानवी भावभावनांचे प्रतिबिंब या दोन महाकाव्यातील विविध पात्रांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. भारतीय संस्कृतीत आजही रामायण व महाभारतातील गोष्टी वाचूनच मुले लहानाची मोठी होतात. काळ आणि पिढी बदलली असली तरी यांची गोडी काही कमी झालेली नाही. दूरचित्रवाहिन्यांवरील कार्टूनच्या जमान्यातही लहान मुलांना रामायण-महाभारताने भुरळ घातली आहे.   

रामायण-महाभारतील गोष्टी संस्कारक्षम वयातील मुलांपर्यंत पोहोचाव्यात आणि यातील पात्रांशी ओळख व्हावी याउद्देशाने काही नामांकित प्रकाशक रामायण-महाभारतील कथा गोष्टी रूपात प्रकाशित करीत आहेत.त्या गोष्टी वाचल्याने मुलांचे एका अर्थाने मुल्यशिक्षण होत आहे.अर्जुनाची एकाग्रता, एकलव्याची गुरूभक्ती, अभिमन्यूचा साहसीपणा, हनुमानाची स्वामीनिष्ठा,राम आणि
लक्ष्मणाचे बंधुत्व, रामाची पितृभक्ती, सुग्रीवाचे मित्रप्रेम अशा गुणाची ओळख मुलांना होत असते. मराठी बालसाहित्यात गेल्या वर्षभरात कथा, विज्ञानविषयक,शैक्षणिक, चित्रकला,नाटक,धार्मिक अशा विषयांवरील तब्बल 450 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मात्र यात रामायण-महाभारताच्या गोष्टींच्या पुस्तकांना मोठ्या प्रमाणात मागणी असून यात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे प्रकाशन व्यावसायिकां
कडून कळते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

बॅड पॅच

अभिनंदन केले पाहिजे

एक छोटासा प्रयत्न

मनातलं मन...

तूच तुझी वैरी

सहज सुचली म्हणून....