'अलबेला' ची जादू...

काही चित्रपट व त्यातील गाणी भाग्यरेषा घेऊनच येतात. असेच भाग्य एका चित्रपटाला लाभले. दहा, विस नव्हे तर चक्क साठ वर्षे उलटून गेली असली तरी तो चित्रपट, त्यातील गाणी आणि त्या चित्रपटाचा 'नायक' हा प्रेक्षकांच्या नेहमी स्मरणात राहतो. तो ऐतिहासिक चित्रपट म्हणजे 'अलबेला' या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घातला होता. संगीतकार सी. रामचंद्र यांनी संगीतबध्द केलेली 'शाम ढले खिडकीतले' आणि 'भोली सुरत दिलके खोटे' ही गाणी तुफानच गाजली इतक्या वर्षांनंतरही त्यांची लोकप्रियता किंचितही कमी झालेली नाही. चित्रपटात मा. भगवान दादा आणि गीता बाली हे मुख्य कलाकार होते. शरीराला वेडेवाकडे झटके न देता जागच्या जागी पावले थिरकवत नाचण्याची स्वतंत्र शैली मा. भगवान दादा यांनी निर्माण केली. हिंदी चित्रपटसृष्टीत बंगाली आणि पंजाबी मंडळींचा वर्चस्व असतांना मराठमोळ्या मा. भगवान पालव यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर काही काळ अधिराज्य गाजवले.

खास नृत्यशैलीने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र स्थान निर्माण करणारे मा.भगवान दादा यांच्या जीवनावर आधारित 'एक अलबेला' चित्रपट येत्या 24 जून रोजी प्रदर्शन साठी सज्ज झाला आहे. यात 'मा. भगवान दादा यांची भूमिका मंगेश देसाई आणि गीता बाली यांची भूमिका बाॅलिवूड मधील आघाडीची अभिनेत्री विद्या बालन या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी रूपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील एखाद्या अभिनेत्याच्या जीवनावर आधारित असलेला हा पहिलाच चित्रपट आहे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

बॅड पॅच

अभिनंदन केले पाहिजे

एक छोटासा प्रयत्न

मनातलं मन...

तूच तुझी वैरी

सहज सुचली म्हणून....