या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
आईचे महत्व
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
आई’ या दोन अक्षरी या शब्दाचा महिमा सारं विश्व व्यापून आहे. आईचे प्रेम, ममता, वात्सल्य, पाठिंबा, बळ यासाठी एक दिवस पुरेसा नाही. पण आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस साजरा केला जातो. तो म्हणजे मातृदिन.आज, १० मे रोजी भारतासह जगभरात 'मातृदिन' उत्साहात साजरा केला जात आहे. आईवरचं प्रेम साजरं करण्याचा हा दिवस. खरंतर आईवरील प्रेम दाखवण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी एक दिवस पुरेसा आहे का? किंवा एकच दिवस का? तिचे महत्त्व, महती व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. पण अनेक थोरामोठ्यांनी आपल्या लेखणीतून आईची थोरवी शब्दात मांडली आहे. मातृदिना निमित्त पाहुया आईबद्दलचे थोरामोठ्यांचे विचार... आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी औषधावर दिलेली लिमलेटची गोळी आई म्हणजे प्रसादाचा खडीसाखर खडा शाळेआधी पाटीवर लिहून दिलेला धडा आई म्हणजे पाठीवरून फिरवलेला हात मेतकूट कालवलेला मऊ तूपभात आई म्हणजे देव्हाऱ्यातले लक्ष्मीचे चित्र सगळ्या मित्रांमधला माझा आवडता मित्र आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं! सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तरीही
त्या आठवणी...
* गेले ते दिवस ,राहील्या त्या आठवणी..........* *बंबात* तापलेल्या पाण्याची *अंघोळ न्हाणीतली* असायची. *लाईफबाॅयशिवाय* दुसरी कंपनी माहीती नसायची. *ok,501* साबणाची वडी कपड्यावर घासायची... *Moti* साबणाचं कौतुक फक्त *दिवाळीला* असायचं. *शाम्पू* कुठला लावताय राव, *निरम्यानचं* डोकं धुवायचं... *दिवाळीच्या* एका ड्रेसवर *वर्षभर* मिरवायचं... *थोरल्याचं* कापडं धाकट्यानं *झिजेपर्यंत* वापरायचं... *चहा चपातीची* न्याहरी, *उप्पीट,पोहे* कौतुकाने असायचे, *पार्ले* बिस्किटाशिवाय चहाला दुसरे जोडीदार नसायचे... *गोल* पंक्तीत बसून सगळ्यांनी मिळून जेवायचं... *खर्डा ,भाकरी,झुणका* पंचपक्वानासारखं लागायचं. *गोट्या,विटीदांडू,लपाछपी........* कधी कधी *पत्त्यांचाही* खेळ रंगायचा... *काचाकवड्या,जिबली* नाहीतर..... *भातुकलीचा* डाव मांडायचा... अधून मधून *चिंचा,पेरू,आंब्याची* झाड शोधायचं... नाहीतर *जिभेला* रंग चढवत *गारेगार* चोखायचं... *गणगाटाची* बैलगाडी,त्याला त्याचाच *बैल* जुंपायचा... *शेंगा* चेचून केलेला चिक्की बाॅल दणकट असायचा... पानं चेचून केलेली *मेंहदी* हातावर खुलायची... *बाभळीच्या* शेंगाची जोडवी बोटात खुळ
आमची बोली भाषा - अहिराणी
भाषा म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय? प्राणी आणि मानव, समूह करून राहतात. त्यामध्ये परस्परांशी संपर्क साधायला, एखादी गोष्ट समोरच्यापर्यंत पोहोचवायला जे माध्यम वापरलं जातं, ते माध्यम म्हणजे भाषा. त्यात अगदी हावभाव, कृती, ध्वनी या सर्वांचा समावेश होतो. भाषेचा नेमका उगम मात्र कसा झाला हे अजून पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. आमची बोली भाषा - अहिराणी... अहिराणी भाषा ही खान्देश विभागणी बोलीभाषा शे. ही भाषा लाखो खान्देशी मानसेनि आवडनि भाषा शे.जवळपास ९५% टक्का खान्देशना लोके अहिराणी बोलतस तेसनी बोलीभाषा शे. जळगाव , धुळे, नंदुरबार, औरंगाबाद तथा नाशिका जिल्हांना काही भाग्मा अहिराणी भाषा बोलतस पारोळा, एरंडोल ,सटाणा,मालेगाव ह्या तालुकास्मा सर्व जाती जामातीसनी मायबोली भाषा शे.जळगाव,नंदुरबार,धुळे त्या नासिक बागलाण, मालेगाव तयां कळवण तालुका जिल्हांना काही विशिष्ट तालुकामा अहिराणी हीच बोलीभाषा शे .ह्यामाभी पोटभाषा शे ज्याम थोडाथोडा बदल जानवस ,जसा चाळीसगाव, मालेगाव व धुळामा वेगवेगळ्या तोनामा हि बोलीजास. अहिराणी हि भाषा हिंदी, मराठी, गुजराथी ह्या भाशासन तोडीमोसन बनेल शे . परंतु अहिराणी भाषणं
सहज सुचली म्हणून....
तुझ्याच हाती सर्व काही. माझ्या हातात काहीच नाही. तुझ्या हाती माझा आणि आईवडीलांचा जीव माझ्याच बँकेत तुझी फीक्स आणि ठेव तूच माझी होम मीनीस्टर तूच माझी फायनांस मीनीस्टर तूच मूलाबाळांसाठी प्रेमाची माऊली जशी उन्हाळ्यात हवीहवीशी वाटणारी सावली तू वजा होता मी शून्य शून्य तू बेरीज होता मी धन्य धन्य माझ्याकडून छोटासा हा एक प्रयत्न पूर्ण होतील आपले इच्छा आणि स्वप्न चलातर मग लॉकडाऊन मध्ये घेऊन यळकोट जय मल्हार जेजूरीचे दर्शन.... विनायक पवार
बॅड पॅच
बॅड पॅच एक संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी 'बॅड पॅच' येतो.शांत सुरळीत सुरु असलेल्या सन आयुष्यात, करीयर मध्ये काहीतरी बिघडतं, नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं, व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो, पैशांची बिकट वाट लागते...नड येते आणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!! हा असा बॅड पॅच आला की तो आपल्या आयुष्यात महिना दोन महिने किंवा क्वचित दोन चार वर्षंही रेंगाळतो... आपलं आयुष्य आंतर्बाह्य हालवून टाकतो... आयुष्य नको करुन सोडतो...आपण कितीही नको म्हणलं, टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅड पॅच येतो.... ... संपूर्ण आयुष्यात एक-दोन-चार-सहा कितीही वेळा येतो... अन आपल्याला तो भोगावा, अनुभवावाच लागतो...कितीही नकोसा वाटला, कितीही त्रास झाला तरी या बॅड पॅचचे काही विलक्षण फायदेही असतात!! यातले दोन प्रमुख फायदे म्हणजे: १. खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे बॅडपॅच असतानाच कळतं... आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं रहातं, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं रहातं हे फक्त बॅडपॅच असतानाच उमगतं! २. आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत रहाते.
मोठे रॅकेट...
कोरोना - जगातील सर्वात मोठे मेडिकल रॅकेट. जर तुम्हाला कोरोना झाला नसेल तर हा मेसेज वाचल्यावर पुन्हा कधीही आयुष्यात कोरोना होणार नाही. जर तुम्हाला कोरोना झाला असेल तर हा मेसेज वाचून तुमचा कोरोना कायमचा बरा होणार. या मेसेजमुळे अखिल मानव जातीचे कल्याण होणार आहे.सगळा भारत कोरोनामुक्त होणार आहे आणि तेही एकही रुपया खर्च न करता. तीन महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे.जगातील कुठल्याच देशाला आजपर्यंत कोरोनावर लस किंवा औषध शोधता आले नाही ही सत्य परिस्थिती आहे. व्यक्तीचे नाव. डॉ-बिस्वरूप राय चौधरी. यांचे काय म्हणणे आहे. 1.टेस्ट किट. तुम्हाला थोडक्या शब्दात सांगायचे झाले तर कोरोना नावाच्या राक्षसाला गेली तीन महिने तुम्ही तुमच्या सर्व अस्त्र,शस्त्र, तंत्र,मंत्र सर्व आर्थिक ताकद लावून लढत आहात पण तो मरत नाही. त्याचे कारण त्या राक्षसाचा जीव त्या कोरोना टेस्ट किट मध्ये आहे. तुम्ही टेस्टच करू नका तुम्हाला कधीच कोरोना होणार नाही. तुम्ही स्वतःला निरोगी समजत असाल तरी तुमची टेस्ट पोजिटिव्ह येऊ शकते. कारण या टेस्ट किट सदोष आहेत. 2. मास्क. मास्क वापरणे हे आरोग्यास सर्वांत अहितकारक आहे. उलट तुम
मनातलं मन...
खूप दिवसांनी ब्लॉग लिहायचा विचार चालू होता.पण फस्ट,सेंकड आणि नाईट शिप्ट असल्या कारणाने काही जमत नव्हते तसेच या तिन्ही वेळा संभाळून आपल्या व्यवसायात पण खारीचा वाटा उचलणे हेही तितकेच माझ्यासाठी खूपच महत्वाचे होते.पगार आज आला की दोन दिवसात कधी संपतो हे फक्त नोकरी करणाऱ्यांना माहीत असते.म्हणूनच वडिलांपासून मिळालेला व्यवसाय चालू असल्याने मला काही पैशांची चणचण कधीच भासली नाही.वडील नेहमीच म्हणायचे मी असो किंवा नसो या व्यवसायाकडे कधीच दुर्लक्ष करू नकोस शेवटी व्यवसाय तुला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढायला नक्कीच मदत करेल.शेवटी त्यांचे बोल खरे ठरले आणि आज प्रत्यक्षात ते मी आज अनुभवतो आहे.काय त्यांची दुरदृष्टी होती मानले पाहिजे त्यांना त्यावेळी सगळे हसण्यावारी आमच्याकडून घेतले जायचे ती आमचीच मोठी चूक होती... आज त्या गोष्टी आठवल्या की आम्हांला आमचीच लाज वाटते.ते सतत दरवर्षी मला एक डायरी नवीन वर्षानिमीत्त भेटवस्तु म्हणून देत... प्रत्येक दिवसाचा हिशेब,आज दिवस भरात आपण काय शिकलो काय नाही याची नोंद करायला लावत जेणेकरून महिन्याच्या शेवटी चर्चा करून भविष्यात ते आपण कधीच विसरून जाऊ नये हा त्यांचा अट्टा
अभिनंदन केले पाहिजे
प्रशासकीय अधिका-याने ठरविले तर तो काहीही करू शकतो, हे गेले दीड वर्ष ठाणे जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार सांभाळणा-या डॉक्टर अश्विनी जोशी यांनी अत्यंत चांगले प्रकारे दाखवून दिले त्याबद्दल त्याचे खूप खूप आभार. पूर्वीच्या काळी गुंडांकडून शासकीय अधिका-यांना त्रास होत होता पण आता हे चित्र उलटे पहावयास मिळते ज्या लोकांनी प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे त्यांच्याकडून आता त्रास व्हायला लागला आहे असे नेतृत्व काय कामाचे.डॉ. अश्विनी जोशी यांनी कणखर कल्पक आणि कार्यकुशल नेतृत्वाने जिल्हाधिकारी कार्यलयाच्या कारभाराला काॅर्पोरेट शिस्त लावली. वन बंधा-यापासून टाऊन हाॅलपर्यंत विविध कामे मार्गी लावली.मात्र ज्यांचे हितसंबंध धोक्यात आले त्यांनी लगेचच राजकीय दडपण आणून त्यांना हटविले. पुर्ण ठाणे जिल्ह्यातील भुमाफीया,अनधिकृत कामं करणारे लोक,खाड्या बुजवून चाळी-गोडाऊन उभारणारे,पर्यावरणाचा सत्यानाश करणारे,अवैध रेती उत्खनन करुन शासनाचा करोंडोंचा महसूल बुडवणारे,अनधिकृत केबल व्यावसायिक आदी सर्व घटकांना कायद्याचा चाप लावून त्यांचे सर्व गैर धंदे बंद पाडून सर्व सामान्यांना दिलासा देणा-या आणि ठाणे जिल्ह्यात कायद्
टिप्पण्या