व्हाय वी शूड हायर यू ?

व्हाय वी शूड हायर यू ? आम्ही तुम्हाला नोकरी का द्यावी ? असा प्रश्न बर्‍याचदा काही मुलाखतकर्ते विचारतात. व्यक्तिश: मला या प्रश्नाचं फारसं समाधानकारक उत्तर आतापर्यंत तरी मिळालेलं नाही. मुळात हा प्रश्न विचारण्याची तशी आवश्यकताच नाही . कारण जर तुम्ही उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावलं असेल, तर हा निर्णय तुमचा आहे. उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावण्याइतपत काही गुण आहेत,
 म्हणून तुम्ही त्याला बोलावलेलं आहे. हे उघड आहे ना, पण तरीही काही महाभाग हा प्रश्न उमेदवारांना विचारतात.
आणि त्यामुळे त्याचं उत्तर देणंही गरजेचं आहे. हा प्रश्न सोडून तर देता येणार नाही. मग तो नीट हॅण्डल कसा करायचा याविषयी आज जरा बोलू.
काही उमेदवार या प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर देतात. ‘‘तुम्ही मला बोलावलं, मग तुम्हीच सांगा.’’ असं बोलून टाकतात. आता सांगा, कोणत्या मुलाखत घेणार्‍याला हे उत्तर आवडेल ? नाहीच आवडत.
तसंही मुलाखत म्हणजे उमेदवाराला स्वत:चं मार्केटिंग करण्याची गरज असते. अर्धा-एक तासाच्या कालावधीत तो स्वत:ला मार्केट करत असतो. त्यामुळे संपूर्ण मुलाखत ही मार्केटिंग मिटिंग असते, अशा वेळेस ह्या प्रश्नाने घाबरण्याचं किंवा गोंधळण्याचं फारसं कारण नाही.
फक्त या प्रश्नाच्या उत्तराची आधी तयारी करणं गरजेचं आहे.
त्यासाठी तुम्ही ज्या पदाच्या मुलाखतीसाठी जाता त्या पदाची तुम्हाला माहिती हवी. त्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता, क्षमता काय हे माहिती हवं, त्या माहितीचा वापर उत्तरात करता येईल.
 समजा, तुम्ही सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदासाठी मुलाखत देणार असाल, तर या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता काय, अनुभव काय, कौशल्य कोणती, ती तुमच्यात कशी आहेत, त्याचा  तुम्हाला नवीन जॉबमध्ये कसा उपयोग होईल, हे प्रभावीपणे सांगता येऊ शकेल.
एका पदासाठी बरेचशे उमेदवार असतात. या सर्व उमेदवारात तुम्ही वेगळे कसे आहात, हेही सांगणं गरजेचं असतं. त्यासाठी काही गोष्टी विचारात घ्या. अनुभव, शिक्षण कदाचित सर्व उमेदवारांकडे असू शकेल, पण  एखादं उत्तम कौशल्य आपल्याचकडे आहे, हे तुम्ही सांगू शकता. उदा. अगदी तणावाखाली काम करण्याचा गुण. ज्यामुळे तुम्ही अधिक प्रभावी ठरू शकता, हा गुण दुसर्‍या उमेदवाराकडे कदाचित नसू शकेल. हे
 उत्तर एखाद्या उदाहरणासहित तुम्ही देऊ शकाल. त्याचा फायदा होऊ शकेल.
तेव्हा या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी थोडा विचार करा, त्यामध्ये कंपनीला कसा उमेदवार हवा आहे, कंपनीचं वातावरण कसं आहे, आवश्यक गुणधर्म कोणते लागणार आहेत. या सर्व गोष्टींमध्ये आपण कोठे फिट होतो, याचा विचार केल्यास या प्रश्नाचं उत्तर देणं सोपं होईल.
आत्मविश्‍वासानं उत्तर द्या,  उद्धटपणानं नाही !

प्रिय निसर्गप्रेमी......

प्रिय निसर्गप्रेमी,

डोंबिवलीच्या समृद्ध निसर्गसंपदेवर आपण सगळ्यांनीच मनापासून प्रेम केलं, करत आहोत. याच निसर्गसंपदेबद्दल

जनजागृती व्हावी म्हणून न्यास ट्रस्ट ने निसर्ग भ्रमंती सुरु केली. ट्रेल्स, स्लाईडशोज्, प्रदर्शनं असे उपक्रम सुरु असताना, न्यास च्या

हौशी पक्षीनिरीक्षकांचा अभ्यासही सुरु होताच. एच.एस.बी.सी. आणि बी. एन. एच. एस. आयोजित ‘मुंबई बर्ड रेस’ चं मॉडेल समोर

होतं. डोंबिवली आणि आसपासच्या प्रदेशात १०० पेक्षा जास्त पक्षीप्रजाती आहेत आणि ह्यालाच कारण तितके अधिवास इथे आहेत,

हे लक्षात आलं होतं. या अधिवासांद्दल जनजागृती व्हावी आणि या अधिवासांकडे वळणारे निरीक्षक वाढावेत म्हणून आम्ही  ‘मुंबई बर्ड

रेस’ च्या धर्तीवर २०१२ साली डोंबिवली बर्ड रेस सुरु केली.

डोंबिवली बर्ड रेस ला फारच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २०१२ आणि त्यानंतरची २ वर्षं बर्ड रेस उत्साहात आणि उत्तम

संख्येमध्ये सुरु राहिली. कितीतरी नवे पक्षी निरीक्षक यात तयार झाले. डोंबिवलीच्या अधिवासांद्दल नवी माहिती मिळू लागली.

स्पॉटेड इगल, ग्रे हेडेड लॅपविंग, ब्लॅक कॅप्ड किंगफिशर, ऑस्प्रे, असे कितीतरी वेगवेगळे पक्षी या निमित्ताने पाहिले गेले. पक्ष्यांचा प्रदेश

विस्तार हा बऱ्याचदा पक्ष्यांचं असणं नाही तर पक्षीनिरीक्षकांचं असणं दाखवतो. हे यातून लक्षात आलं. इथल्या अधिवासांमध्ये

असणाऱ्या खजिन्याच्या नोंदीचं महत्व पुन्हा कळलं.

गेल्या 3 वर्षांच्या बर्ड रेस मध्ये पक्षीनिरीक्षक खूप तयार झाले. त्यातले काही तर अगदी तज्ञ म्हणावेत इतका त्यांनी

अभ्यास केला. हे सगळं घडत असतानाच नष्ट होत जाणारे अधिवास आम्ही पाहत होतो. भोपरच्या टेकड्यांची आक्रसत जाणारी

झाडी, सुशोभीकरणाच्या नावाखाली निळजेच्या तलावाचं नाहीसं झालेलं नैसर्गिक सौंदर्य, खोणीचा जलपर्णीने भरून टाकलेला

तलाव, रेतीउपशामुळे खाडीची झालेली अवस्था पाहिली. पुढील काही वर्षांनी बर्ड रेस घेण्याइतके तरी पक्षी या अधिवासांमध्ये

असतील का असा प्रश्न पडायला लागला. हे पाहत असताना असं वाटलं की या नष्ट होत जाणाऱ्या अधिवासांबद्दल आपण काही करू

शकतो का? आपण जे जनजागृतीचं काम करत आहोत त्याचं स्वरूप बदलायला हवं का?

उत्तर मिळालं हो. हे स्वरूप बदलायची गरज आहे. अनेक पक्षीनिरीक्षक, निसर्गप्रेमी या उपक्रमातून तयार झाले. त्यांना

एकत्र आणायची गरज आहे. त्यांच्या भटकंतीतून जमा झालेली डोंबिवलीच्या अधिवासांची माहिती एकत्र  करण्याची, त्यातून

अधिवासांच्या परिस्थितीचं स्वरूप समजून घेण्याची आणि जर त्यावर काही उपाय शोधता आला तर तोही शोधण्याची गरज आहे. हे

लक्षात आलं आणि डोंबिवली बर्ड रेस कडून आम्ही डोंबिवली बर्ड फेस्टिव्हल कडे वळलो. खरंतर आम्ही अजूनही या कल्पनेवर

अडखळत आहोत. पण कुठेतरी सुरुवात व्हायलाच हवी.

सकाळी 3 वेगवेगळया ठिकाणी ट्रेल्स, संध्याकाळी पक्ष्यांच्या नोंदीसंबंधी चर्चा, ‘ठाणे खाडी बचाव मोहिम’ या यशस्वी

मोहिमेची गोष्ट ऐकायला मिळणार आहे. डॉ. राजू कसंबे  यांचं ‘पक्षीशास्त्रातील करीअरच्या संधी’ यावर व्याख्यान होईल.

अधिक माहितीसाठी संपर्क :

गायत्री ओक: ९६१९९११२८९

खंजन रवाणी: ९८३३५८८४७५

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...