आणि पहिली रेल्वे धावू लागली...

पहिली रेल्वे मुबई ते ठाणे धावू लागली !!
१६ एप्रिल १८५३ जगातील पहिली रेल्वे इंग्लंडमध्ये १८२५ च्या सुमारास धावल्यानंतर इ.स. १८४४ मध्ये हिंदुस्थानात आगगाडी सुरू करावी असा प्रस्ताव जगन्नाथ शंकरशेठ यांनी ब्रिटीशांकडे मांडला. ३१ ऑक्टोबर १८५० रोजी शीव येथे पहिली कुदळ मारून रेल्वेच्या बांधकामाला प्रारंभ झाला. जवजवळ४५ लाख रुपये खर्च करून मुंबई-कल्यामपर् यंतचा रेल्वेमार्ग सुरू करण्याचे पूर्ण श्रेय लॉर्ड डलहौसीला दिले जाते ते चुकीचे आहे , कारण त्यासाठी फार मोठे कष्ट नानांनीच घेतले आहेत. वाद हे त्या काळीही होते. मीटर गेज रेल्वे असावी की ब्रॉड गेज यावर तेव्हा वाद झाला.
१५ ऑगस्ट १८५४ रोजी कलकत्त्याला, ३ फेब्रुवारी १८५५ रोजी राणीगंज असा रेल्वे प्रवास सुरूझाला. तथापि १६ एप्रिल १८५३ रोजी हिंदुस्थानातील पहिली रेल्वे मुंबईत धावली. लोकांनी या पहिल्या रेल्वेचे स्वागत कसे केले हे ऐकल्यावर आजच्या पिढीलानक्कीच आश्चर्य वाटते.
१६ एप्रिल १८५३ रोजी मुंबईकरांचा गोंधळ उडाला होता. आज ते एक चमत्कार पाहणार होते. साहेबाचे पोर बिनबैलाची गाडी हाकणार होते. या शुभदिनी मोठमोठे साहेब , नेटिव्ह उपस्थित होते. १८ डबे आणि तीन महाकाय इंजिन असलेल्या या पहिल्या रेल्वे प्रवासाचा आनंद ५०० लोकांनी लुटला. आपापल्या दर्जानुसार लोक गाडीत बसले होते.
नामदार यार्डली , जज्ज चार्लस् जकसन तसेच नाना शंकरशेठ ही मंडळी उपस्थित होती. गव्हर्नर लॉर्ड फॉकलंड यांनी या ऐतिहासिकसोहळ्यावर बहिष्कार घातला होता.पण त्यांच्या पत्नी मात्र या समारंभास उपस्थित होत्या.आणि १६एप्रिल १८५३ ला दुपारी ३.३० वाजता इतिहास घडला. तोफांची सलामी देण्यात आली. गार्डने शिट्टी वाजवून हिरवा बावटा दाखविल्याबरोबर त्या राक्षसी आकाराच्या तीन इंजिनांनी कर्णभेदी भोंगे वाजवले. त्या इंजिनांच्या धुरांचे लोळ ढगांप्रमाणे भासत होते. काळे पोषाख घातलेले इंजिनाच्या पोटात असलेले खलाशी , फावड्याने कोळसा आगीत लोटत होते. त्या तीन राक्षसी अजस्र इंजिनांनी चमत्कार घडवला. ती गाडी चक्क चालू लागली.
लोक बोलू लागले की , पुराणकाळात आपण अद्भूत चमत्काराच्या गोष्टी नुसत्याच ऐकतो. पण आता कलियुगात इंग्रज त्या प्रत्यक्षात करून दाखवतात. इंग्रजांचा राजा देवाचा अवतार , अशी लोकांची समजूत झाली. परिणामी ते अद्भूत दृश्य पाहून लोकांनी हात जोडून लोटांगण घातले. गाडीचा वेग , शिट्ट्यांचा आवाज याने लोक भयचकित तर झालेच , पण गायी , बैल भेदरले आणि कुत्रे पिसाळल्यासारखे भुंकू लागले. एकीकडे लष्करी बँडही निनादत होता.
मुंबई ते ठाणे हे अंतर कापायला गाडीने तब्बल ५७ मिनिटे घेतली. यामध्ये गावागावात लोक तिच्या स्वागताला तयार होते. गाडी भायखळ्याजवळ आली तेव्हा तिच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती. लोक दाटीवाटीने गच्चीवर , डोंगरावर उभे राहून या चमत्काराला नमस्कार करत होते आणि ४.५८ वाजता गाडी ठाणे स्टेशनावर पोहोचली , तेव्हा तिच्या स्वागतासाठी ठाण्यात भव्य शामियाना उभारण्यात आला होता. सर्व पाहुण्यांना शाही मेजवानी देण्यात आली. तेथे प्रतिष्ठितांची भाषणे होऊन ६.३०वाजता ठाणे सोडून बरोबर ५५ मिनिटे आगीची गाडी बोरिबंदर स्टेशनावर पोहोचली. तर असा होता पहिल्या आगगाडीचा प्रवास कोणत्याही चमत्काराला दैवत्व बहाल करणा-या भारतीयांनी या गाडीचे नामकरण केले , ‘ चाक्या म्हसोबा’.
रेल्वे हे क्रांतीचे प्रभावी हत्यार ठरले. इंग्रजांनी रेल्वेआणली ती त्यांच्या फायद्यासाठी.१८५७ चा उठाव दडपण्यासाठी रेल्वे ही फार मोठी शक्ती होती. स्वातंत्र्यप्रा प्तीनंतर भारताची रेल्वे आशिया खंडात सर्वात मोठी तर जगात आज पाचव्या क्रमांकावर आहे.
आज आपल्या लोहमार्गाची लांबी नऊलाख किलोमीटरच्या आसपास आहे. 2016 च्या सुमारास भारतात रेल्वेयुग अवतरून 163 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने 163 वर्षापूर्वीच्या इंजिनाला डबे जोडून तशाच प्रकारचा दिमाखदार सोहळा केला , तो पाहायलाही हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते.
भारतीय रेल्वेच्या वाढदिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

अभिनंदन केले पाहिजे

बॅड पॅच

मनातलं मन...

एक छोटासा प्रयत्न

तूच तुझी वैरी

सहज सुचली म्हणून....