पोस्ट्स

टॉक टाईम

इमेज
दरवर्षी एखादा उत्सव साजरा व्हावा तशा प्रकारचे वातावरण 'म्हाडा'ची जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर मुंबईत तयार होते. मुंबईत स्वतःचे घर असावे, असे स्वप्न पाहणारे शेकडो लोक म्हा...

'हमाल दे धमाल'

इमेज
पुर्वी अभ्यास न करणा-या मुलांना हमालाकडे बोट दाखवून सांगितले जायचे, की अभ्यास कर नाहीतर अशी हमाली करावी लागेल. परंतु लोकसेवा आयोगातर्फे हमालांच्या 5 जागेसाठी अर्ज मागव...

फक्त दोनच.......

इमेज
सिनेमांची कमाई आता 100 कोटींवरून 200 कोटींवर झेपावणार असल्याच्या कितीही बाता बॉलिवूडकरांकडून मारल्या जात असल्या, तरी त्या पोकळ ठरल्याचं दिसून येतंय यंदाच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या सुमारे 80 हिंदी चित्रपटांपैकी जेमतेम 2 चित्रपटांना 100 कोटींचा आकडा गाठता आलाय. प्रेक्षकांची पसंती आशयघन सिनेमांना जास्त मिळते. सिनेमातून दिल्या जाणा-या संदेशावर लोकांचं लक्ष आहे. यावर्षांची सुरुवातच अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर असे दोन तगडे स्टार असलेल्या 'वझीर' ने झाली खरी पण हा चित्रपट चालला नाही. अक्षय कुमारच्या 'एअरलिफ्ट' नं आशयाच्या जोरावर 128 कोटीचा बिझनेस केला. त्याच्यानंतर मात्र शाहरूखचा 'फॅन' प्रियांका चोप्राचा 'जय गंगाजल' सोनम कपूरचा 'नीरजा' हे चित्रपट पोटापुरता गल्ला जमवत एक्झिट घेतली.पण अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'हाऊसफुल्ल 3' या मल्टीस्टारर चित्रपटानं 106 कोटींचा आकडा पार केला.

'अलबेला' ची जादू...

इमेज
काही चित्रपट व त्यातील गाणी भाग्यरेषा घेऊनच येतात. असेच भाग्य एका चित्रपटाला लाभले. दहा, विस नव्हे तर चक्क साठ वर्षे उलटून गेली असली तरी तो चित्रपट, त्यातील गाणी आणि त्या चित्रपटाचा 'नायक' हा प्रेक्षकांच्या नेहमी स्मरणात राहतो. तो ऐतिहासिक चित्रपट म्हणजे 'अलबेला' या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घातला होता. संगीतकार सी. रामचंद्र यांनी संगीतबध्द केलेली 'शाम ढले खिडकीतले' आणि 'भोली सुरत दिलके खोटे' ही गाणी तुफानच गाजली इतक्या वर्षांनंतरही त्यांची लोकप्रियता किंचितही कमी झालेली नाही. चित्रपटात मा. भगवान दादा आणि गीता बाली हे मुख्य कलाकार होते. शरीराला वेडेवाकडे झटके न देता जागच्या जागी पावले थिरकवत नाचण्याची स्वतंत्र शैली मा. भगवान दादा यांनी निर्माण केली. हिंदी चित्रपटसृष्टीत बंगाली आणि पंजाबी मंडळींचा वर्चस्व असतांना मराठमोळ्या मा. भगवान पालव यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर काही काळ अधिराज्य गाजवले. खास नृत्यशैलीने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र स्थान निर्माण करणारे मा.भगवान दादा यांच्या जीवनावर आधारित 'एक अलबेला' चित्रपट येत्या 24 ...

दखल

इमेज
चित्रपट हा समाजमनाचा आरसा असतो असे मानले तर आपल्या चित्रपटातून आपण काय संदेश देत आहोत आणि समाजमनावर त्याचा काय परिणाम होणार आहे हा विचार दिग्दर्शकाने करणे अपेक्षित आहे. अनेकदा चित्रपट पाहून तरूण वाईट शिकतात, मग रामायण बघून चांगले का शिकत नाहीत, असा प्रश्न केला जातो. चित्रपट, साहित्य या सगळ्यांचाच समाजमनावर कळत नकळत परिणाम होत असतो. परिणाम होत नसेल तर त्या चित्रपटाला अर्थ तरी काय राहिला? म्हणूनच चित्रपटासारखे माध्यम अतिशय काळजीपूर्वक आणि जवाबदारीने हाताळले पाहिजे.शाहीद कपूर चा उडता पंजाब हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. पुन्हा शाहीद कपूर ने आपल्या अभिनयाने सर्वाना आपली दखल घ्यायला भाग पाडले.                त्याचे वडील अभिनयातले 'दादा' म्हणून ओळखले जातात. तरी त्याने त्यांची ओळख सुरूवातीच्या काळात कधी सांगितली नव्हती. त्याला नृत्याची आवड होती.नृत्यात निपुण आहे म्हणून 'दिल तो पागल है' नाहीतर 'ताल' सारख्या चित्रपटात नाचणा-यांच्या गर्दीत तो पहिल्यांदा झळकला. मग एका पॉप गाण्यात तो चमकला. त्याला पहिल्यानंतर हा पोरगेलसा दिसणारा बॉलिवूडचा हिरो...

'एक खेळ एक संघटना'

इमेज
बाॅक्सिंगसारख्या वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये आॅलिम्पिकची पदके लुटण्याची भरपूर संधी असते. ही संधी साधण्याची क्षमताही भारतीय खेळाडूंकडे आहे. लंडन येथे झालेल्या आ...

रामायण-महाभारताची गोडी...

इमेज
'रामायण' आणि 'महाभारत' ही महाकाव्ये भारतीय समाजात पिढ्यानपिढ्या वाचली जात आहेत.मानवी भावभावनांचे प्रतिबिंब या दोन महाकाव्यातील विविध पात्रांच्या माध्यमातून आपल्याल...