श्रद्धा आणि त्या मागचे रहस्य......

🍋🎋लिंबू मिरची🎋🍋
श्रद्धा आणि त्या मागचे रहस्य......
लिंबू मिरची बांधणे ही प्रथा तुम्हाला अंधश्रद्धा जरी वाटत असली तरी ती अंधश्रद्धा न म्हणता काल बाह्य प्रथोमोपचार उपाय म्हणू शकता. कारण ज्या काळात वाहनांचा शोध लागला नव्हता त्या काळात लोक चालत किवा बैल गाडीतून प्रवास करीत असत. मैलो मैलाच्या ह्या प्रवासात बैलगाडीला लिंबू , मिरची , बिबवा हा एका टोकदार तारेत ओवून गाडीच्या अश्या भागात बांधत कि तो लगेच लोकांचा निदर्शनात पडेल. किंवा प्रत्येक घराच्या बाहेर हे टांगले जात असे जेणे करून घरासमोरून जाणार्या वाटसरूना तो लगेच मिळेल .
पण हे का? असा प्रश्न आता तुम्हाला हि पडला असेल?
ह्याचे उत्तर असे आहे कि मैलो मैली चालत असताना माणसाला तहान लागल्यास पाणी उपलब्ध न झाल्यास लिंबू तोंडात पिळून तोंडात लाळ निर्माण करण्यात येते ज्या मुळे माणसाची तहान तात्पुरती क्षमावता येवू शकते. त्या काळी साप नाग यांचा वावर फार मोठा होता, म्हणून चालत जाताना एखादा साप चावल्यास त्याला मिरची खायला देत जेणे करून हा साप विषारी होता कि बिनविषारी ह्याची माहित मिळे. जर साप चावला असताना मिरची तिकठ लागली तर साप बिनविषारी होता आणि तीकठ नाही लागली कि साप हा विषारी होता. असा अंदाज बांधला जात. बिबवा हा उत्कृष्ट एनटीबायोटीक समजला जातो म्हणून जखम झाल्यास , कापल्यास बिबवा लावला जात , आणि हे सगळे एका टोकदार तारेत ओवले जात जी तार पायातला काटा काढण्यास उपयोगात येई. अश्या प्रकारे हा प्रथोमपचार बैल गाडीवर , घराच्या दर्शनी भागात लावला जात कारण त्याचा उपयोग प्रथोमोपचार साठी लावला जात. पुढे वाहने आली आणि हा प्रथमोपचार एक प्रथा बनून अजून हि चालू आहे. आणि कधी प्लास्टिक चे लिंबू मिरची कधी बिबव्याच्या जागी कोळसा असे काही हि यंत्र बनवून विकले जात असून खरच हा एक मोठा धंदा झाला आहे. ह्या बाबत आपल्या मित्रांना माहिती व्हावी म्हणून आणि हिंदू धर्मातील प्रथा त्या त्या वेळेस वैज्ञानिक दृश्यट्या कश्या योग्य होत्या हे दाखविण्यासाठी हि माहिती देतो आहे.
ती जास्तीती जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि हा प्रथमोपचारपद्धतीची कशी प्रथा झाली ह्याची माहिती पोहोचावी हा एकच उद्धेश….

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गणपती बाप्पा मोरया...

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आमची बोली भाषा - अहिराणी

बॅड पॅच

अभिनंदन केले पाहिजे

एक छोटासा प्रयत्न

मनातलं मन...

तूच तुझी वैरी

सहज सुचली म्हणून....