झिका विषाणूबाबत भारतातही सतर्कता

नवजात बालकांच्या मेंदूची वाढ खुंटविणाऱ्या झिका या विषाणूचा प्रसार दक्षिण अमेरिका खंडामध्ये सध्या फार वेगाने होत आहे. या विषाणूला वेळीच आवर नाही घातला, तर वर्षअखेरीपर्यंत तब्बल चाळीस लाख नागरिकांना या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या समस्येचा सामना करण्याबाबत चर्चा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने एक फेब्रुवारीला तातडीची बैठकही बोलाविली आहे. 

जन्मजात होणाऱ्या या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः मातेच्या गर्भातच होतो. या रोगाला मायक्रोसेफॅली म्हणतात. इतर व्यक्तींनाही हा रोग होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीप्रमाणे, या विषाणूने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. इबोलाप्रमाणेच या विषाणूबाबतही जागतिक पातळीवर धोक्‍याचा इशारा जारी करण्याबाबत या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे. 2014 ला ब्राझीलमध्ये झालेल्या विश्‍चचषक फुटबॉल स्पर्धेसाठी आलेल्या विदेशी नागरिकांकडूनच हा विषाणू दक्षिण अमेरिकेत आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ब्राझीलमध्येच या विषाणूचा प्रसार अधिक असल्याने जन्माला येणाऱ्या पिढीतील बहुतांश जणांना हा रोग होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

काय आहे झिका विषाणू? ताप, डेंगी, चिकुनगुनियासारखे आजार पसरविण्यास जबाबदार असलेल्या "एडिस इजिप्ती‘ या डासांद्वारेच झिका विषाणूचा प्रसार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या विषाणूमुळे मातेच्या गर्भात असलेल्या बालकांच्या मेंदूची वाढ खुंटण्याची (मायक्रोसेफॅली) शक्‍यता असते. प्रादुर्भाव झाल्यास अविकसित मेंदू असलेल्या बालकाचा जन्म होतो. त्यामुळे गर्भवती महिलांना या विषाणूपासून मोठा धोका आहे. प्रादुर्भाव झाल्यास ठळक लक्षणे दिसत नसल्याने रुग्णांवर उपचार करणे अवघड असते. या विषाणूमुळे मोठ्या माणसांनाही अर्धांगवायू होण्याची शक्‍यता असते. 


लक्षणे या रोगामुळे मृत्यू दुर्मिळ असला तरी डोकेदुखी, सांधेदुखी, त्वचा खाजणे, उलट्या, ताप आणि डोळे दुखणे अशी साधारण त्याची लक्षणे आहेत. प्रादुर्भाव झालेल्या चारपैकी एकाच व्यक्तीमध्ये ही लक्षणे दिसून येतात. 


विषाणूचा प्रसार - 1947 मध्ये आफ्रिका खंडातील युगांडामध्ये प्रथम या विषाणूच्या प्रादुर्भावाची घटना आढळली होती. 
- 1960 मध्ये नायजेरियामध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव झालेला पहिला रुग्ण आढळला. 
- काही काळातच अशी अनेक प्रकरणे समोर आल्याने त्याचे गांभीर्य वाढले. 
- 1966 मध्ये दक्षिण आशियामध्येही याचा रुग्ण आढळला. 
- 1970 च्या दशकात पाकिस्तान, भारत, मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये हा विषाणू सापडल्याची नोंद 
- 2007 मध्ये मायक्रोनेशिया बेटावरील दोनशे जणांना प्रादुर्भाव 
- 2013 मध्ये फ्रान्सच्या आधिपत्याखालील पॉलिनेशिया येथे तब्बल 35 हजार रुग्ण आढळले. 
- 2014 मध्ये ब्राझीलमध्ये रुग्ण आढळला. 
- 2015 मध्ये कोलंबियामध्येही विषाणूची नोंद 
- 2015 च्या डिसेंबरमध्ये मेक्‍सिकोलाही रुग्ण आढळल्याने सर्व अमेरिकेमध्ये धोक्‍याचा इशारा 
- युरोपमधील काही देशांमध्येही विषाणूची नोंद 

तीव्रता आणि परिणाम - गर्भवती महिलांना गर्भपात करण्याची परवानगी देण्याची ब्राझीलमध्ये मागणी 
- ब्राझीलमध्ये यंदा ऑलिंपिक स्पर्धा होणार असल्याने त्यानंतर विषाणूचा प्रसार जगभर होण्याची भीती 
- दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलसह 23 देशांमध्ये विषाणू पसरला आहे 
- आतापर्यंत 50 नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद 
- एकट्या ब्राझीलमध्ये आतापर्यंत चार हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. 
- अमेरिका आणि कॅनडाच्या संशोधकांनी या विषाणूला प्रतिबंध करणारी लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

आताच एवढा धोका का? आतापर्यंत या विषाणूचा प्रादुर्भाव झालेले रुग्ण आढळले असले तरी त्यामुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण अत्यल्प होते. तसेच, अनेकदा काही विशिष्ट भागापुरताच त्याचा प्रसार झालेला आढळला होता. गेल्या आठवड्यात मात्र या रोगाची जवळपास चार हजार प्रकरणे पुढे आल्याने आणि तीव्रताही अधिक असल्याने जागतिक आरोग्य संघटना चिंतेत आहे. गर्भाच्या कोणत्या अवस्थेत असताना हा रोग होतो, याबाबतही निश्‍चित माहिती नसल्याने उपचार करणेही कठीण जात आहे. 

उपाय या रोगावर उपचार करणारी कोणतीही लस अथवा औषध सध्या अस्तित्वात नाही. मात्र, लक्षणे आढळलेल्या रुग्णांना अधिक पाणी पिण्याचा आणि विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे. डासांचा प्रादुर्भाव असलेल्या जागेमध्ये जाणे टाळावे. दक्षिण अमेरिका खंडातील देशांमध्ये सध्या प्रवास करणे टाळण्याचा सल्लाही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. 

झिका विषाणूबाबत भारतातही सतर्कता नवी दिल्ली - काही देशांमध्ये झिका विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरत असल्याच्या वृत्ताच्या पार्श्‍वभूमीवर भारतातही सतर्कता बाळगली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीला आरोग्य मंत्रालय आणि एम्समधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तांत्रिक गटाने तातडीने उपाययोजना करावी आणि आवश्‍यक ती पावले उचलावीत, अशा सूचना आरोग्य मंत्र्यांनी दिल्या. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि झिका विषाणूचा धोका टाळण्यासाठी भारत आवश्‍यक ती सर्व पावले उचलेल, असे नड्डा यांनी बैठकीनंतर सांगितले. 

वर्षअखेरपर्यंत लस शक्‍य 
अनेक देशांसाठी धोकादायक ठरू पाहणाऱ्या झिका विषाणूचा सामना करण्यासाठी उपयुक्त लस या वर्षअखेरपर्यंत उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. अमेरिका आणि कॅनडाचे संशोधक ही लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. "झिका‘चा सामना करण्यासाठी कदाचित ही पहिली लस असेल, असे एका वरिष्ठ संशोधकाने सांगितले.

" जुगार. "

दोन मिनिटं वेळ काढुन नक्की वाचा "
" जुगार. ".
-----------------
पहिल्याच दिवशी वर्गामध्ये सरांचेआगमन
झाले.
ओळखीचे सत्र सुरु करण्यात आले.
तुमचे नाव काय.....?
तुमचे गाव काय....?
असे प्रश्न विचारण्यात आले....
कुणाचे बाबा वकील, डॉक्टर तर कुणाचे
इंजिनीअर.....
माझा नंबर येताच...
मी पटकन उभा राहिलो व चटकन
सांगितले
“सर, माझे बाबा शेतकरी आहेत.”
मी असं म्हणताच सगळा वर्ग
हसायला लागला.....
मला याचा फार राग आला.....
मी म्हटले “सर मी नाही म्हणत,
या साऱ्यांचा धंदा छोटा हाय,
पण,....या काळ्या आईची शपथ
सर...या साऱ्याहून
माझा बाप मोठा हाय....
हाडाची काडं करून रात दिन राबत
असतो,
तो राबतो म्हणून तुम्ही आम्ही दिसतो...
काड्याकुड्याचं जिनं त्याचं
पण,
साऱ्या जगाला भाकर देतो..
अन् साऱ्या जगाला भाकर देणारा,
कधी कधी उपाशीच झोपतो
माहित नसताना पाऊस येईल-नाही येईल,
हजारो रुपये मातीत गाळतो,
खरंच सर तो मातीसंग जुगारच खेळत असतो.
सगळे जण जगण्यासाठी जुगार खेळतात
पण,
माझा बाप जगवण्यासाठी जुगार खेळतो.
अन्,
या जगण्याच्या जुगारीमध्ये तो नेहमीच
हरतो.
माणुसकीच्या गावामध्ये अजून
त्याची वस्ती हाय,
खरंच सर माझ्या बापाची मरणा संग
दोस्ती हाय....
फाटके तुटके कपडे सर
तो अजूनही अंगावर घालतो....,
पण,
सर मला तुमच्या कपडयाचाही
त्याचाच घामाचा वास येतो.
टाकून पहा मातीत सर तुम्ही
पाच-पन्नास हजार, तेव्हाच तुम्हाला कळेल,
त्याच्या जगण्याचा जुगार.
म्हणून,
म्हणतो सर अभिमान हाय मला
माझा बाप शेतकरी असल्याचा
अभिमान आहे मला
मी या शेतकऱ्याचा वारस असल्याचा
जग लिहिते आईसाठी,
जग लिहिते साऱ्यांसाठी पण,
मी लिहितो बापासाठी, त्याच्याच
जीवनाचा जुगार........”
दारूचा स्टाॅक संपत नाही
तंबाखू-शिगरेट चा स्टॉक संपत नाही
ऐवढच काय तर गुटका बंदी असुनही गुटक्याचा स्टॉक
कधी संपत नाही.
तर मग ऐण पेरणीच्या दिवसात खता-बियांण्याचा
स्टॉक कसा काय संपतो......?
आणी वाढीव पैसे देताच लगेच कसा काय उपलब्ध
.....होतो

बस करा आता शेतकर्यांना लुबाडुन खाणं. ....
कारण,
ज्या दिवशी आम्हा शेतकर्यांचा अन्नधान्याचा
स्टाँक संपेल ना
तेव्हा तुम्हाला भिक पण मिळणार नाही.
सर्वानसाठी पोस्ट केला पन
जगाचा पोशिंदा शेतकऱ्यासाठी एक पोस्ट
मनापासून पटल तर शेयर करा.
कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा,
रात्रभर झोप नाही येणार.
विचार करा शेतकऱ्याच कस होत असेल !!

मराठी चित्रपटातील एक मानाच पान म्हणजे 'नटसम्राट'

                                  मराठी चित्रपटातील एक मानाच पान म्हणजे 

         
        नटसम्राट' हा चित्रपट. ह्या चित्रपटाच आताच मोठ्या जोश्यात आगमन झाले. चित्रपट सुपर हिट झाला. त्याबद्द्ल सर्व मराठीबांधवांना धन्यवाद. परंतु ह्या चित्रपटाची copy लिक झाली. परंतु मी सर्व ज्यानी हा चित्रपट पाहीला नाही व पहायचा आहे त्याना विनंती आहे की हा कृपया चित्रपट थिएटर मधेच जाउन पहावा कारण ह्या चित्रपटातील profit मधून काहीभाग गरीब शेतकऱ्यांना जानार आहे. त्या गरीब शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून. सर्वानी हा चित्रपट नक्की थिएटर मधेच पहा.

२५५ वर्षांपूर्वीची संक्रांत

                 🚩२५५ वर्षांपूर्वीची संक्रांत🚩

         "पानिपत" ! मराठ्यांना पडलेले एक दुःखद स्वप्न !
         १७६१ साली आजच्याच दिवशी म्हणजेच 'मकरसंक्रांतिला' सव्वा लाख मराठे धारातीर्थी पडले.
संपूर्ण देशावर चालून आलेले, "अहमदशहा अब्दाली" नावाचे संकट ! व त्याला प्रतिकार करण्यासाठी हजारो मैल "पानिपतावर" सामोरे गेले ते फक्त "मराठे" !!!
पण तोपर्यंत 'पेशव्यांनी' गनिमी कावा सोडला होता, कुटुंब-कबिल्याला फौजेबरोबर न्यायचे नाही हा "शिवरायांनी घालून दिलेला संकेतही मोडीत काढला होता ! १लाख अठरापगड जातीच्या मराठा सैन्याला, लढण्याबरोबरच काळजी घ्यायची होती ती लाखाहून जास्त 'पेशव्यांच्या' नातेवाईकांची, यात्रेसाठी सैन्याच्या बरोबर आलेल्यांची, बाजारबूनग्यांची !!
१४ जानेवारी १७६१ ! मराठ्यांनी पराक्रमाची शर्त केली. मध्यान्हीचा सूर्य तळपत होता, उपाशीपोटी आणि अपुऱ्या वस्त्रांनिशी "मराठे" रणांगणावर थैमान घालत होते. शिंदे, होळकर, गायकवाड, माने, पायगुडे, शिळमकर आदी सरदारांच्या मावळ्यांचा "शिवाजी महाराजकि जय" असा जयघोष चालू होता. अब्दालीने पळ काढला व तो टेकाडावर सुरक्षित ठिकाणी गेला. नकळत त्याच्या तोंडातून निघाले "साले ये मरहट्टे किस मिट्टीसे बने है ?" हटतच नाहीत !!
सूर्य मावळतीकडे चालला, उपाशीपोटी मराठ्यांना भोवळ येत होती तरी ते शत्रूला 'पाणी' पाजत होते. अब्दालीने ताज्या दमाची कुमक उतरवली ! आणि पारडे फिरले ! युद्धाचा नूरच पालटला.
उपाशी व थकलेल्या मराठ्यांना, ताज्या दमाच्या शत्रूसैन्याने कापून काढायला सुरुवात केली, जगातील एक भयानक रणसंहार सुरु झाला ! महाराष्ट्रातील एकही गाव नसेल, जेथील "मावळा" या युद्धात मेला नाही ! सव्वा लाख सवाष्णींचे चुडे फुटले !! "मराठ्यांचे पानिपत" झाले !!!
या युद्धाचे पडसाद आजही उमटताना दिसतात. उत्तरेत आजही मराठा वीरांच्या शौर्यकथा सांगितल्या जातात ! परकीय चक्रापासून देशाला वाचविण्यासाठी, संपूर्ण एक "पिढी" अर्पण करणाऱ्या या महाराष्ट्राला देशाने सलाम केला !
आज "मकरसंक्रांत" साजरी करताना, गोड-धोड व तिळगूळ यांचा आस्वाद घेताना, कोठेतरी मनाच्या कोपऱ्यात त्या अज्ञात "पानिपतवीरांना" श्रद्धांजली वाहूयात.

‘सारस न्याहळा अन्‌ घटस्फोट टाळा‘..!

सामाजिक प्रतिष्ठा व व्यक्तिगत अहंकाराने जगभरात शेकडो जोडीदारांचे संसार उद्‌ध्वस्त होत असताना, वैवाहिक निष्ठा हेच ‘जीवन‘ मानून जगणारा ‘सारस‘ हा एकमेव सजीव..! जोडीनेच राहणार, एक खाली मान घालून अन्न खात असेल तर दुसरा वर मान करून टेहाळणी करणार..! अंडी उबवण्याचा अधिकार फक्‍त मादीचाच या निसर्ग नियमालाही छेद देत अंडे उबणारा नर पक्षी ‘सारस‘ हा एक चमत्कारच..! 
आयुष्यभर प्रत्येक क्षण जोडीदारासोबच जगताना एकाचा प्राण गेला तर दुसरा अन्नत्याग करून आत्महत्या करणारा ‘सारस‘..! या देखण्या व रुबाबदार पक्षाची जोडीदारासोबतची वैवाहिक निष्ठा व प्रेम म्हणजे आजच्या ‘लिव्ह अँड रिलेशन‘च्या युगात डोळ्यात अंजन घालणारीच मानावी लागेल.

‘सारस‘च्या या वैशिष्ट्यामुळेच राजस्थान व दक्षिण भारतात वैवाहिक वाद होणाऱ्या मानवी जोडप्यांना सारस पाहायला पाठवण्याची पद्धत रूढ आहे.
गोंदीयापासून दहा किलोमीटरवर परसवाडा या पारंपरिक खेड्याच्या परिसरात हा ‘सारस‘ सध्या जगण्याचा संघर्ष करत आहे. स्वार्थी मानवी स्वभावाचा
बळी ठरत असलेला व जगभरात नामशेष होत असलेला ‘सारस‘ जगावा, यासाठी गोंदीया जिल्हाधिकारी कार्यालय आणि सेवाभावी संस्थांनी पराकाष्ठा सुरू केली आहे.
पायाची नखे ते चोच अशी किमान साडेपाच ते सहा फूट उंचीचा हा अत्यंत देखणा पक्षी. विस्तीर्ण पंख विखुरले तर तब्बल चौदा ते सोळा फुटांपर्यंत रुंद..! भातशेतातच स्वत:चं घर करणारा अन्‌ त्यामध्ये किमान तीन ते चार किलो वजनाचं अंड घालून प्रजातींची संख्या वाढवणाऱ्या या पारस पक्ष्यांवर शेतकऱ्यांची कुऱ्हाड कोसळत होती. 2000 पर्यंत नामशेष होण्याच्या मार्गावर सारस होता. केवळ चार जोड्याच शिल्लक होत्या.

मराठी मुलाच्या विश्वविक्रमाने कॉलर का वर करू नये?

प्रणव धनावडेचं सहस्रदर्शन!
एक क्षण, एक दिवस. माणसाचं आयुष्य बदलू शकतं. प्रणव धनावडे हा कालपर्यंत कुणीही नव्हता. असलाच तर तो एक रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करणाऱ्या मेहनती माणसाचा क्रिकेट खेळणारा मुलगा होता.
एका अधिकृत शालेय स्पर्धेत त्याने एका डावात १००९ धावा केल्या. तो अचानक सर्व प्रसारमाध्यमांच्या मथळ्याचा विषय बनला. उद्यापासून त्याचं आयुष्य बदलू शकतं. या विश्वविक्रमी मुलाचे वडील रिक्षा चालवतात असं आता म्हटलं जाईल.
प्रथम त्याच्या विश्वविक्रमाचं कौतुक करू या. कालपर्यंत एका खेळीत एक हजार धावांचं पहाटेला स्वप्न पडणं, हासुद्धा वेडेपणा ठरवला गेला असता. त्याने त्या प्रत्यक्षात केल्या. मीही ती बातमी ऐकल्यावर प्रथम स्वतःला चिमटा घेऊन पाहिला. आणि मी जागा असल्याची खात्री करून घेतली. मग कुणीतरी मला म्हणालं, 'मैदानाच्या स्क्वेअर सीमारेषा लहान होत्या.' असतील! माझं म्हणणं आहे की, गल्लीतच काय, घराच्या व्हरांड्यात, 'बाजूच्या भिंतीला चेंडू लागला की दोन धावा आणि समोरच्या भिंतीला लागला की चार धावा' अशा नियमात खेळूनही हजार धावा करणं सोपं नाही. आईने गोलंदाजी टाकली तरी कठीण आहे. आज कलियुगाऐवजी द्वापारयुग असतं, तर कुणीतरी स्वर्गस्थ देवाने, भीष्माच्या 'इच्छामरणाच्या' वराच्या धर्तीवर प्रणवला 'इच्छाबाद' होण्याचा वर दिला होता किंवा प्रतिस्पर्धी संघाला विध्वंसाचा शाप दिला होता वगैरे म्हटलं गेलं असतं. तशी कथानकं लिहिली गेली असती.
मी ती खेळी पाहिलेली नाही. पण त्या खेळीचं डोळ्यांसमोर चित्र उभं करताना गंमत वाटली. ३२७ चेंडूत त्याने १००९ धावा कुटल्या. (कुटल्या या क्रियापदाला सुद्धा कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं असेल.) म्हणजे निर्धाव चेंडू हा अॅवॉर्डचा विषय ठरला असेल. क्षेत्ररक्षकांनी फक्त कुरिअर कंपनीचं काम केलं असावं. गोलंदाजांच्या भावना या रोड रोलरखाली पिचल्या जाणाऱ्या डांबरापेक्षा वेगळ्या नसाव्यात. के. सी. गांधी शाळेच्या एका विद्यार्थ्याने बॅटने केलेली हिंसा पाहून स्वर्गात महात्मा गांधीसुद्धा सुखावले असतील. ही अशी एकमेव हिंसा, जिचं कौतुक होतं.
तो टी-२०च्या युगातला आहे म्हणून तो अशी खेळी इतक्या कमी चेंडूत खेळला. त्याच्याकडे फटके असावते. महत्त्वाचं म्हणजे त्याने दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना म्हणे चक्क १००० धावांचं स्वप्न पाहिलं. माय गॉड! असं स्वप्न पुरं करताना गल्लीतसुद्धा दबाव येऊ शकतो. पण तो टी-२० च्या युगातला एक शाप ठरू शकतो. म्हणून त्याला उःशापाची गरज आहे. त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी या शतकाकडे एक गोड स्वप्न म्हणून पाहावं आणि विसरून जावं. त्यांचं आयुष्य आता बदलेल. कौतुकाचे चेक्स येतील. प्रसारमाध्यमं तो खेळायला लागल्यावर घोंगावायला लागतील. त्याने लक्षात ठेवावं. या गोष्टी क्षणभंगुर असतात. टी-२० आयपीएलचा हव्यास अजिबात धरू नको. शाळेत मोठी शतकं ठोकणारे अनेक झाले. पण पुढे त्या सगळ्या टेकड्या ठरल्या. पण दोनच फलंदाज खरीखुरी हिमशिखरं ठरली. एक सुनील गावसकर, दुसरा सचिन तेंडुलकर. एक कांचनजंगा, दुसरं एव्हरेस्ट!
इच्छा एवढीच आहे की इथून पुढे त्याने पाय घट्ट जमिनीवर ठेवून चालावं. फलंदाजी नावाच्या देवतेला फक्त धावांचाच अर्घ्य दिला की ती प्रसन्न होते. ती प्रसन्न झाली की लक्ष्मीची वेगळी पूजा करावी लागणार नाही.
कल्याण म्हटलं की, शिवाजी महाराजांच्या काळातली सुभेदाराच्या सुनेची दंतकथा आठवते. आता प्रणव धनावडे दंतकथा बनू शकतो. त्याचं हे 'सहस्रदर्शन' एक छोटंसं बीज आहे. त्याचा वृक्ष होतो का, हे त्याची मेहनत, त्याची गुणवत्ता, त्याची निष्ठा ठरवेल.
तूर्तास, एका मराठी मुलाच्या विश्वविक्रमाने कॉलर का वर करू नये?

मुंबईतील 136 वर्षे जुना हँकॉक पूल

मुंबईतील 136 वर्षे जुना हँकॉक पूल येत्या रविवारी म्हणजेच 10 जानेवारील पाडला जाणार आहे. मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासननं एकत्रितपणे हा पूल तोडणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेवर 18 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.
शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजल्यापासून रविवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विशेष ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान मध्य रेल्वेची भायखळा ते सीएसटीपर्यंतची वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. या कामामुळं 100 हून अधिक लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
या काळात बेस्टच्या ज्यादा बसेस भायखळा आणि सीएसटी दरम्यान सोडण्यात येणार आहेत. तसेच 8 ते 10 जानेवारी या तीन दिवसात लांब पल्ल्याच्या 42 गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. ब्रिटीशांनी 1879 साली हँकॉक ब्रिज बांधला. या ब्रिजचा अडथळा येत असल्यानं लोकलच्या वेगावर मर्यादा येत होती. तसेच ब्रिजची उंचीही कमी असल्यानं ट्रॅकची ऊंचीही वाढवता येत नव्हती. त्यामुळं या भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठत होते.
9 जानेवारीला या गाड्या रद्द :
पंढरपूर – सीएसटी मुंबई पॅसेंजरसाईनगर शिर्डी – सीएसटी मुंबई पॅसेंजरसोलापूर – सीएसटी मुंबई एक्स्प्रेसनागपूर – सीएसटी मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेसअमरावती – सीएसटी मुंबई एक्स्प्रेसलातूर – सीएसटी मुंबई एक्स्प्रेसश्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस – सीएसटी मुंबई सह्याद्री एक्स्प्रेसगोरखपूर – सीएसटी मुंबई स्पेशल
10 जानेवारीला या गाड्या रद्द :
सीएसटी मुंबई – भुसावळ पॅसेंजरसीएसटी मुंबई – पुणे इंद्रायणी सुपरफास्ट एक्स्प्रेससीएसटी मुंबई – पुणे इंटरसिटी एक्स्प्रेससीएसटी मुंबई – पुणे डेक्कन एक्स्प्रेससीएसटी मुंबई – श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोयना एक्स्प्रेससीएसटी मुंबई – पुणे सिंहगड एक्स्प्रेससीएसटी मुंबई – पुणे प्रगती एक्स्प्रेससीएसटी मुंबई – नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेससीएसटी मुंबई – पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेसृसीएसटी मुंबई – मनमाड पंचवटी सुपरफास्ट एक्स्प्रेससीएसटी मुंबई – मनमाड राज्य राणी एक्स्प्रेससीएसटी मुंबई – अमरावती एक्स्प्रेससीएसटी मुंबई – लातूर एक्स्प्रेससीएसटी मुंबई – सोलापूर एक्स्प्रेससीएसटी मुंबई – पंढरपूर एक्स्प्रेससीएसटी मुंबई – साईनगर शिर्डी एक्स्प्रेसपुणे – सीएसटी मुंबई सिंहगड एक्स्प्रेसमनमाड – सीएसटी मुंबई राज्य राणी एक्स्प्रेसपुणे – सीएसटी मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमनमाड – सीएसटी मुंबई पंचवटी एक्स्प्रेसपुणे – सीएसटी मुंबई प्रगती एक्स्प्रेसभुसावळ – सीएसटी मुंबई पॅसेंजरपुणे – सीएसटी मुंबई डेक्कन एक्स्प्रेसश्री शाहू छत्रपती शाहू महाराज टर्मिनस – सीएसटी मुंबई कोयना एक्स्प्रेसपुणे – सीएसटी मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेसपुणे – सीएसटी मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस
9 तारखेला या गाड्याचं शॉर्ट टर्मिनेशन :
नांदे़ड – सीएसटी मुंबई तपोवन एक्स्प्रेस (नाशिकपर्यंत धावणार)
10 तारखेला या गाड्याचं शॉर्ट टर्मिनेशन :
मडगाव – सीएसटी मुंबई कोकणकन्य एक्स्प्रेस (पनवेलपर्यंत धावणार)सोलापूर – सीएसटी मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस (दादरपर्यंत धावणार)गोंदिया – सीएसटी मुंबई विदर्भ एक्स्प्रेस (ठाण्यापर्यंत धावणार)श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस – सीएसटी मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस (ठाण्यापर्यंत धावणार)नागपूर – सीएसटी मुंबई दुरान्तो एक्स्प्रेस (दादरपर्यंत धावणार)नागपूर – सीएसटी मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस (दादरपर्यंत धावणार)

बोनस म्हणजे काय ?

बोनस म्हणजे काय ?
काळजीपूर्वक वाचा
कामगार जगतात मालकाकडुन प्रत्येक आठवड्याला पगार देण्याची भारतात पुर्वी पद्धत होती. 
जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा त्यानी इंग्रजी महिन्या प्रमाणे पगार देण्याची पद्धत आणली. आठवड्याच्या पगार पद्धतीनुसार वर्षात 52 आठड्यांचा पगार मिळत होता. 4 आठवड्यांचा एक महीना धरला असता वर्षामध्ये 13 पगार मिळायलाच हवेत. परंतु इंग्रजी पद्धतीनुसार ते बाराच मिळतात.
ही बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा 13 पगार मिळण्या करीता महाराष्ट्रात त्यावर निदर्शने झाली. आणि त्यातुन तेरावा पगार द्यावा लागणार या विचाराने तो कसा देता येइल ह्यावर विचार विनिमय होताना तो कधी द्यायचा हे ठरले. भारतीय संस्कृती नुसार वर्षभरात मोठा सण म्हणजे दिवाळी. त्या सणाच्या आधी एक पगार द्यायचा असे ठरले. तेव्हा दिवाळीचा बोनस द्यायच्या नियम भारतात लागु झाला.
अात्ताच्या कंपन्या बोनस देतो म्हणजे आपण कामगारांवर उपकार करतो असे त्याना वाटते. परंतु इंग्रजी पद्धत व भारतीय अर्थ व्यवस्था याचा योग्य मेळ घालण्यासाठी केलेली ती एक योग्य उपाय योजना आहे. हे सर्वानी लक्षात घेतले पाहीजे.
30 जुन 1940 साली याचा निर्णय होवून तो कायदा लागु झाला होता.
हे महत्व कित्येकांना माहीत नाही. म्हणुनच आज आपणास या द्वारे देत आहे.

HOPE SPECIALITY PHARMA

किडनी, एडस्, कर्करोग अशा रोगांवरील औषधे महाग असल्याने सगळ्यांनाच याचा उपचारखर्च परवडत नाही.मात्र आता घाबरण्याचे कारण नाही. DADAR येथे स्टेशन पासुन फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर " HOPE SPECIALITY PHARMA " सुरू झाले आहे. या रोगांवरील औषधे येथे अत्यंत कमी दरात उपलब्ध आहेत.
उदा. एखाद्या इंजक्शन ची किंमत ६ हजार असेल ते आपणास येथे केवळ 1400 रू पर्यंत मिळेल.
पत्ता - 
होप speciality फार्मा
Old BDD 2A/2,S.S.Wagh mg,
Gandhi chowk,Naigaon,
Dadar east.
मुंबई :400014.
संपर्क करा :
hspmumbai@gmail.com
फोन क्रमांक : 9224247365\9022247365/
02224147365

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...