बॅड पॅच

बॅड पॅच एक संघर्ष
प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी 'बॅड पॅच' येतो.शांत सुरळीत सुरु असलेल्या सन आयुष्यात, करीयर मध्ये काहीतरी बिघडतं,
नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं,
व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो,
पैशांची बिकट  वाट लागते...नड येते आणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!! हा असा बॅड पॅच आला की तो आपल्या आयुष्यात महिना दोन महिने किंवा क्वचित दोन चार वर्षंही रेंगाळतो... आपलं आयुष्य आंतर्बाह्य हालवून टाकतो... आयुष्य नको करुन सोडतो...आपण कितीही नको म्हणलं, टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅड पॅच येतो.... ...
  संपूर्ण आयुष्यात एक-दोन-चार-सहा कितीही वेळा येतो... अन आपल्याला तो भोगावा, अनुभवावाच लागतो...कितीही नकोसा वाटला, कितीही त्रास झाला तरी या बॅड पॅचचे काही विलक्षण फायदेही असतात!!
यातले दोन प्रमुख फायदे म्हणजे:
१. खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे बॅडपॅच असतानाच कळतं... आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं रहातं, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं रहातं हे फक्त बॅडपॅच असतानाच उमगतं!
२. आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत रहाते.
अत्यंत वाईत परिस्थितीत आणि प्रसंगांत आपण कसे वागतो,
काय बोलतो, काय करतो,
काय निर्णय घेतो
हे आपलं आपल्याला समजू शकतं..
आपली शक्तीस्थळं आणि मर्यादा यांची नव्यानं जाणीव होते
स्वतःविषयीचा विश्वास वाढतो आणि जगण्याविषयीची नम्रताही येत रहाते...!अर्थात, बॅडपॅच येणंही आपल्या हातात नाही आणि टाळणंही आपल्या हातात नाही... पण तो जेंव्हा येतो तेंव्हा त्याला प्रतिसाद कसा द्यायचा react कसं करायचं हे आपल्या हातात असतं... आपला बॅडपॅच आहे नाकारून उद्दामपणे जगत रहायचं आणि स्वतःचं नुकसान करत रहायचं का तो स्वीकारून नम्र व्हायचं, आत्मपरीक्षण करायचं आणि स्वतःत बदल घडवत सजग जगायचं हे आपल्याच हातात असतं!!असो... आपणा सर्वांच्या आयुष्यात कमित कमी बॅडपॅच येवोत आणि जे येतीलच त्यांमधून आपलं आयुष्य अधिकाधिक समृद्ध करण्याची ताकद आपणां सर्वांना लाभो...!

यश की अपयश

  बेरोजगारांना रोजगार सहाय्य देण्यासह विद्यार्थी व तरुणांना मार्गदर्शन करण्याच्या उदेशाने राज्य सरकारने एम्लाॅयमेंट एक्स्चेजची स्थापना केली. शेकडो तरुण आणि तरुणी नोकरी
मिळविण्यासाठी या केंद्रात नाव नोंदवतात. सन 2010  मध्ये ठाण्यात याच केंद्रातून 41 हजार 82 बेरोजगारांना नोकरी मिळाली होती. सन 2011 मध्ये तो आकडा 11 हजार 975 इतका घसरला आणि 2012 मध्ये हे प्रमाण केवळ साडेआठ टक्के आहे. ठाणे एम्लाॅयमेंट एक्स्चेजच्या नोंदणीपटावर 1 लाख 4 हजार 793 मधुन फक्त 13 हजार 277 उमेदवारांनाच नोकरी मिळाली. त्यातील 13 हजार 119 नोकऱ्या खाजगी क्षेत्रातील आहेत केंद्र सरकारच्या सेवेत 28 राज्य शासनात 83 जणांना नोकरी मिळाली आहे. तसेच 513 अपंग 795 मूक बधिर मधुन एक अंध उमेदवाराला नोकरी मिळाली.
    सन 2014 मध्ये या विभागाच्या नोंदणीपटावर 2 लाख 32 हजार बेरोजगार नोकरी च्या प्रतीक्षेत होते त्यापैकी फक्त 21 हजार जणांना नोकरी मिळाली तर 2015 मध्ये हा आकडा आणखी घसरला असून 2 लाख 22 हजार मधून फक्त 7 हजार 382 जणांना नोकरी मिळाली.

टिव्ही वाले दादा

टिव्ही वाले दादा तुम्ही काही बी दाखवा..
कुबेर यंत्र
हनुमान यंत्र
महालक्ष्मी यंञ दाखवा...
पण
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्या साठी एखाद यंत्र दाखवा
टिव्ही वाले दादा तुम्ही काही पण दाखवा
भवानी ची खोटी तलवार दाखवा
खोटा इतिहास दाखवा
पण ....
छञपती शिवाजी महाराजांवर पहिला वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी एकदा तरी दाखवा..
टिव्ही वाले दादा तुम्ही काही पण दाखवा ......
जोतिष्य भविष्य राशी चक्र सगळं थोतांड दाखवा...
पण.....
महामानव डाँ बाबासाहेब  आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा एकदा तरी दाखवा....
टिव्ही वाले दादा तुम्ही काही पण दाखवा.......
रामदेव बाबा दाखवा
कामदेव दाखवा
ट्रीपल  श्री दाखवा
आसाराम दाखवा  राजकारणात घुसलेले सगळे जंत दाखवा.....
पण एकदा तरी अंगावर चिंध्या पांघरुन जनतेची निस्वार्थ पणे सेवा करणारे खरे
संत गाडगेबाबा एकदा तरी दाखवा...

सहा षटकारांचे गुपित

     अशक्य असे जगात काहीच नसते कोणाला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते की स्टुअर्ट सारख्या वेगवान गोलंदाजी करणा-याला सहा चेंडूत सहा षटकार मारणे युवराजला पण ती मॅच होण्याअगोदर जर कोणी मुलाखतीत जर हा प्रश्न विचारला असता वेगवान गोलंदाजी करणा-याला तु सहा चेंडूत सहा षटकार मारशील का तर तोही  विचारात पडला असता.
  प्रत्येक नावजलेल्या क्रिकेटपटूच्या जीवनाशी अशी एक खेळी जोडलेली असते की त्याचं नाव उच्चारलं की ती खेळी सहज आठवते. युवराज सिंग नाव घेताच त्यानं एकाच षटकात ठोकलेल्या सहा षटकारांचे गुपित अखेर युवराजने एका मुलाखत मध्ये सांगितले 
     युवाराजनं २००७ मधील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार खेचत इतिहास रचला. जणू एखाद्याचा बदला घ्यावा अशाच भावना त्याच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. त्याचा चेहरा गंभीर आणि नजर चेंडूवर पक्की बसली होती. आलेला प्रत्येक चेंडू विना अडथळा सीमापार करायचा अशाच पद्धतीने तो फटके लगावत होता. युवराजच्या या तडाखेबंद खेळीला कारणीभूत होती फ्लिंटॉफनं केलेली शेरेबाजी.
     तुला चांगले फटके खेळताच येत नाही, तू अत्यंत वाईट खेळतोस, असं फ्लिंटॉफ युवराज ला म्हणाला होता.त्याचा सगळा राग त्याने गोलंदाजी करण्यास आलेला स्टुअर्ट वर काढला.फिरकी गोलंदाजी करणा-याला एक वेळ सहा चेंडूत सहा षटकार मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो पण वेगवान गोलंदाजाला सहा वेळा चेंडू सीमापार पाठविणे सोपे नाही आहे.

सैराट बघा

‘सैराट’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत राहिला आहे. त्यातूनचं दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी चित्रपटाचा टीजर आणि प्रोमो गाणे प्रदर्शित करून सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचवली आहे.
सैराट बघण्याची 17 कारणे
---------------------------------
1) जगभर गाजलेला फँड्री बनवणाऱ्या दिग्दर्शकचा दूसरा चित्रपट
2) अजय-अतुल या प्रतिभावंतांचे संगीत
3) बर्लिन अंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सवात 2016 मधील एकमेव मराठी चित्रपट
4) बर्लिन अंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सवात आजवर निवड झालेला केवळ चौथा मराठी चित्रपट
5) हॉलीवुड मधे संगीत रिकॉर्डिंग झालेला सैराट हा केवळ मराठीच नव्हे तर भारतातील पहिला चित्रपट
6) रिंकू राजगुरु ह्या नाववीत शिकणाऱ्या अकलूजच्या ( सोलपुर ) पोरीने पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रिय पुरस्कार पटकावला
7) 'पिस्तुल्या' , 'फँड्री' आणि आता 'सैराट' या तिन्ही चित्रपटासाठी अनुक्रमे सूरज पवार, सोमनाथ अवघडे आणि रिंकू राजगुरु यांना सलगपणे राष्ट्रिय पुरस्कार मिळवून देऊन हैट्रिक साधणारा कदाचित एकमेव भारतीय चित्रपट दिग्दर्शक- नागराज पोपटराव मंजुळे
8) नवख्या नॉन-एक्टर पोरांना घेऊन अफलातून अविश्वसनीय काम करून घेणारा दिग्दर्शक
9) आतापर्यन्त रिलीज झालेले अत्यंत दर्जेदार टीजर व song प्रोमो, ट्रेलर
10) आकाश ठोसर हा मराठी चित्रपट सृष्टिला घवसलेला योग्य वयातील हैण्डसम हिरो
11) खऱ्या अर्थाने सिनेमैटिक लैंग्वेजचा वापर करणारा दिग्दर्शक उदा: फँड्री, सैराटचे टीजर song promo
12) जातिभेदाचे विषमतेचे चटके सोसत तळा गाळातून जीवघेणा संघर्ष करीत वर आलेल्या व तरीही कोणाबद्दल द्वेष वा मनात विखार न बाळगणाऱ्या माणसाची अभिव्यक्ति- सैराट
13) प्रखर सामजिक भान असणारा माणसाची कलाकृती
14) जातीपातीला विषमतेला मुठमाती देण्यासाठी झटनारा दिग्दर्शक
15) आपल्या अपेक्षा खोट्या ठरवत आपल्या गुळगुळीत झालेल्या अभिरुचिला धक्का देणारा व नव्यानं चित्रपटाची भाषा समजून सांगणारा दिग्दर्शक
16) नागराज पोपटराव मंजुळे - बस नाम ही काफी है फ़िल्म देखने के लिए
17) कुठल्याही जातिपातीच्या चौकटीत न अडकता माणूस म्हणून उन्नत भूमिका मांडणाऱ्या माणसाची कलाकृती.
नक्की पहावा
प्रदर्शित तारीख:- २९/४/२०१६
Hindi चित्रपटांची जाहीरात खूप करता, आता एकदा मराठी चित्रपटाचीही करा.. जय महाराष्ट्र..

ऐकावे ते नवल

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान व आयसिसचे झेंडे फडकवणाऱ्या फुटिरतावाद्यांनी आता थेट दहशतवाद्यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धा भरविण्यापर्यंत मजल मारली आहे. दक्षिण काश्मीरमधील त्राल येथे नुकतीच ही स्पर्धा भरवण्यात आली होती. विशेष म्हणजे या स्पर्धेतील काही संघांना दहशतवाद्यांची नावं देण्यात आली होती. 

आता पोलिओ इंजेक्शन

देश पोलिओमुक्त झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने २७ मार्च २०१४ ला जाहीर केले. त्यानंतर पी १ आणि पी ३ विषाणूबाधित रुग्णांसाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाने पोलिओ लसीकरणात बदल केले आहेत. आता पी १ आणि पी ३ च्या विषाणूंसाठी बालकांना पोलिओ इंजेक्शन (आय.पी.व्ही) देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
२५ एप्रिलपासून देशभरात ही लसीकरण पद्धत सुरु करण्यात आली आहे. बालकांना मुखावाटे देणाऱ्या पोलिओ लसीच्या पहिल्या व तिसऱ्या डोसाबरोबर पोलिओ इंजेक्शन ही लस देण्यात येणार आहे. ही लस ०.१ मी.ली उजव्या दंडावर इंजेक्शनद्वारे दिली जाणार आहे  त्यामुळे बालकांना पोलिओ रोगापासून दुहेरी संरक्षण मिळणार आहे. या दोन्ही लसी एकत्रितपणे पोलिओ रोगाचा पुर्न:उद्भव आणि पुर्न: संसर्ग रोखता येतील.
पोलिओ हा आजार पी १, पी २ आणि पी ३ या तीन विषाणूंमुळे होतो. तीन वर्षांत देशात एकही पोलिओचा नवीन रुग्ण आढळून न आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने देशाला ‘पोलिओमुक्त घोषित’ केले.

कळवा ईस्ट आणि वेस्ट

जुन्या पीसीचा उपयोग गरीब, गरजू विद्यार्थ्यांना झाला तर? हीच कल्पना उचलून कळव्यामध्ये राहणारा तुषार जाधव हा ग्राफिक डिझायनर काम करतोय. donateyourpc.in नावाची साइट त्यानं सुरू केली असून, विद्यार्थ्यांना जुने कम्प्युटर मोफत दुरुस्त करून देण्याचं कामही तो करतोय.

तुम्ही सुद्धा डोनेट करू शकता तुमचा जुना कंप्युटर गरजू विद्यार्थ्यांसाठी...

तहान लागल्यावर

"तहान लागल्यावर विहीर खणायची" हे  जेवढं मूर्खपणाचं लक्षण आहे, तेवढाच मूर्खपणा आपण एप्रिल महिना सुरु झाल्यावरच जे "पाणी वाचवा" ओरडतो, त्यात ही आहे.
पाणी हे काय फक्त एप्रिल लागल्यावर जपून वापरण्यासाठी असतं का ? "पाणी जपून वापरा" ही मोहीम आपण वर्षभर का राबवू शकत नाही ?कुणीतरी म्हटलेलंच आहे कि "पुढचं युद्ध तेल आणि पाण्यासाठी होईल" ते आता खरं होईल कि काय असं वाटायला लागलंय.केवळ आज तुमच्या घरात बादलीभर पाणी आहे म्हणून एखादा तुमचा मुडदा पाडून, ते पाणी घेऊन जाईल अशी परिस्थिती खरंच येऊ शकते.पाच-सातशे वर्षांपूर्वी, चंद्रगुप्त मौर्याने कुणाशी विवाह करून कुठचा मौर्य जन्माला घातला, आणि महम्मद गजनी ने कुणासोबत काय दिवे लावले हा अभ्यासक्रम आता बास झाला. त्यापेक्षा पाण्याचे व्यवस्थापन अर्थात (Water Management and Water Conservation) हा विषय शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवा असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही शेतकरी असाल किंवा शहरी, हा विषय शिकलाच पाहिजे असं Compulsion असायला हवं.
    आज इजराइल सारख्या देशात आपल्या १० टक्के पाऊस पडतो तरीही तिथे नंदनवन फुलू शकतं. ह्याचं कारण म्हणजे त्यांचा Water Management हा अभ्यास इतका पक्का आहे, कि एकदा नळातून पडलेलं पाणी, हे जवळपास सात वेळा Recycle & Reuse होऊनच शेवटी जमिनीवर पडतं. हे आपण अमलात का आणू शकत नाही ?
आपण स्वतःला 'शेती प्रधान 'देश म्हणवतो. आपल्याकडे मुबलक प्रमाणात पाउस पडूनही, आपल्याकडे पाण्याचे दुर्भिक्ष का आहे ?अहो पाउस पडायला आज चार दिवस उशीर झाला तर सगळ्यांची 'हवा टाईट ' होईल ही परिस्थिती येतेच कशी ?जपान मध्ये पाणी कसं वाचवतात हे फोटो नुसते इथे शेअर करून भागणार आहे का ? ते अमलात कोण आणणार ? इथे 'पाणी वाचवा' हे ओरडायचं आणि दुसऱ्या दिवशी मात्र ३२ दात घासायला ३२ भांडी पाणी ओतायचं हे चालणार आहे का ? आज आपल्याला बटन दाबलं कि वीज मिळते, आणि नळ सोडला कि पाणी पडतं ह्याचा माज आलाय असं मला आता वाटतं.
     गणेशोत्सव, नवरात्री-उत्सवात, कुठलेतरी पांचट विनोद मारणारे कलाकार बोलावण्यापेक्षा, किंवा कुठल्यातरी हिडीस गाण्यांचा ऑर्केस्ट्रा ठेवण्यापेक्षा, 'पाणी वर्षभर कसं वाचवता येईल' ह्यावर देखावा करा किंवा व्याख्यान देणारा एखादा वक्ता बोलवावा. सण-वार-उत्सव साजरा करताना सुद्धा पाण्याचा अपव्यय कसा टाळता येईल ह्याची खबरदारी प्रत्येक मंडळाने घ्यावी. प्रत्येक धर्माच्या लोकांनी, आपापल्या सणाला हे पाळायलाच हवं. गणपती असो कि बकरी-ईद कुणीही ह्याला अपवाद असता कामा नये. शेवटी पाणी आणि वीज ही राष्ट्राची संपत्ती आहे. ती वाचवायलाच हवी.आज आपण मंगळावर पाणी आहे का हे शोधायला यान सोडतोय. उद्या देव न करो पण पृथ्वीवर कुठे
पिण्यासाठी पाणी सापडतंय का हे शोधण्यासाठी यान सोडावं लागेल.
      

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायलास

लोक म्हणतात

लोक म्हणतात........
   मुलीना जर आई वडिला चा सांभाळ करायचा अधिकार असता तर जगात कोणीचं अनाथ आश्रमामध्ये गेलं नसतं , पण प्रत्येक मुली ने जर सासु सासरे सांभाळले असते तर जगात अनाथ आश्रमचं राहिल नसत...
वृद्धाश्रमात आईवडिलांना बघून सर्व लोक मुलाना दोष देतात,
परन्तु, लोक हे कसे  विसरतात की,
तिथे पाठविण्यामध्ये कुणाच्या मुलीची पण मुख्य भूमिका असते,
नाहीतर मुलानी लग्ना आधीच आईवडिलाना वृधाश्रमात नसत का पाठवल,संस्कार मुलीना पण दया म्हणजे कुणी फ़क्त मुलाना दोष लावणार नाही.
कटु आहे पण सत्य आहे.

सेवेचा अवश्य लाभ घ्या

मुंबई सेंट्रल – पणजी ( गोवा ) मार्गावर आजपासून एस. टी.ची वातानुकुलीत शिवनेरी सेवा...
उन्हाळ्यात गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांचा आणि कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा विचार करून रा. प. महामंडळातर्फे आजपासून मुंबई सेंट्रल ते पणजी मार्गावर शिवनेरी वातानुकुलीत सेवा सुरु करण्यात आली आहे. सदर बस मुंबई सेंट्रलहून रात्रौ ८ वाजता सुटून ५७४ किमीचा प्रवास दादर – कुर्ला नेहरू नगर – मैत्री पार्क – वाशी हायवे – नेरूळ – बेलापूर – पनवेल – महाड – चिपळूण – हातखंबा - लांजा – राजापूर – कणकवली – कुडाळ – सावंतवाडी – म्हापसा मार्गे पार पाडून पणजीत दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता पोहोचेल. मुंबई सेंट्रल ते पणजी प्रवास भाडे रु. १४६० आकारण्यात येईल. तर पणजीहून मुंबई सेंट्रलला परतणारी बस पणजीहून संध्याकाळी ५:३० वाजता सुटेल आणि चिपळूण मार्गेच मुंबईला सकाळी ५ वाजता पोहोचेल.
उपरोक्त बसचे संगणकीय आरक्षण महामंडळाच्या
https://public.msrtcors.com/ticket_booking/ ह्या संकेतस्थळावर तसेच सर्व आरक्षण केंद्रांवर उपलब्ध असून प्रवाशांनी ह्या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा.
तिकीट दर:
मुंबई ते पणजी: १४६० रु.
मुंबई ते सावंतवाडी: १३५९ रु.
मुंबई ते कणकवली: १२१७ रु.
मुंबई ते राजापूर: १०५९ रु.
मुंबई ते चिपळूण: ७११ रु.

योग्य प्रस्ताव ठेवा

  केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारवर दोन महिन्यांत एकाच विषयावरचे प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की एकदा नाही तर दोनदा आेढवली आहे. कर्मचा-याना आपल्या भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्यासाठी सरकारने घातलेल्या 58 वर्षे वयाच्या अटीच्या विरोधात देशभरात कामगार संघटनांनी आंदोलन करून हा प्रस्ताव मागे घ्यायला भाग पाडले आणि दुसरे कर्मचारी काढणार असलेल्या 60 टक्के रकमेवर कर आकारण्याचा अर्थमंत्री अरूण जेटली यांचा प्रस्ताव पचनी न पडल्याने तोही मागे घेण्यात आला. स्वतःचे पैसे काढण्यासाठी 58 वर्ष कोण वाट पाहणार? दोन्ही दुरूस्त्या आणि प्रस्ताव चुकीचे होते सरकारचा प्रस्ताव मागे घेण्याची आेढावलेली नामुष्की एकीकडे सरकारचा कमकुवतपणा जाहीर करते तर दुसरीकडे सरकारचे वास्तवापासून सुटलेले भान दर्शवते चांगले दिवस दाखवण्याचे स्वप्न दाखवले होते हेच का ते चांगले दिवस तुम्ही तुमचे प्रस्ताव असे मांडा की जेणेकरून ते देशासाठी आणि सामान्य नागरिकांसाठी फायदेशीर ठरतील.

हे कसे शक्य

   स्वत:च्या घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पै आणि पै साठवण्यापासून स्वस्त घरासाठी दूरवर जाण्यापर्यंतचे अनेक प्रयत्न सर्वसामान्य माणूस करत असतो.  त्याचा हा गुण लक्षात घेऊन बांधकाम व्यवसायिक भुलविणा-या योजना अधूनमधून आणतात पुण्यात सध्या वादाच्या भोव-यात अडकलेल्या स्वस्त घराच्या योजनेतून याचीच प्रचीती येत आहे. मेपल समूहाने पाच लाखात 3
खोल्याचे वन बीएचके घर देण्याची ही योजना जाहीर केली आहे.आणि  अनेकांच्या भुवया उंचावल्या.  महानगरामध्ये घरांचे दर गगनाला भिडले असतांना पुण्यात पाच लाखांत घर कसे शक्य आहे.

एक नविन पत्रकारिता

    'कन्हैय्याला मनसेचे कवच' अशी निराधार बातमी देणाऱ्या जय महाराष्ट्र वाहिनीचा खोटेपणा उघड झाला. वृत्तवाहिनीने आज बेधडक
पणे आणि वस्तुस्थितीचा कोणताही आधार नसताना'महाराष्ट्रात कन्हैय्याला राज ठाकरे समर्थन देणार, अशी बातमी चालवली आणि एकूणच राजकीय वर्तुळात आणि समाज माध्यमांवर खळबळ उडवण्याचा प्रयत्न केला.जय
महाराष्ट्र' हा शब्द उच्चारला किंवा ऐकला तरी मराठी माणूस काही क्षण का होईना रोमांचित होतो. अशी ताकद या शब्दात आहे.पण 'जय महाराष्ट्र' याच नावाने चालणाऱ्या वाहिनीने या शब्दाला आज बट्टा लावला.राजसाहेबांवर टीका केली की टीआरपी मिळतो हे गणित माहित असल्यामुळे टीआरपी कमी झाला की कर राजसाहेबांवर टीका हा माध्यमांचा खाक्या आहे. पण आज जय महाराष्ट्रने तर यांवर कडी केली.साहेबांनी न केलेलं विधान आणि न मांडलेली भूमिका चॅनेलवर मांडून टाकली.कोण कुठला कन्हैय्या त्याला मनसेचं कवच म्हणे.अहो जिथे आमचा नेता एका बाजूला मराठवाड्यातल्या उन्हात मराठी तरुणांच्या हक्कांसाठी झालेल्या आंदोलनाच्या वेळच्या केसेसकरता न्यायालयात हजर राहतोय आणि दुसरीकडे दुष्काळग्रस्तांकरता जलसंधारणाचे प्रकल्प राबवतोय तो असल्या कन्हैय्या सारख्या रिकामटेकड्या माणसाला कवच द्यायला कशाला जाईल.
      जंगलात वाघ नुसता फेरफटका मारायला जरी बाहेर पडला तरी बाकी प्राण्यांची धावपळ सुरु होते. हे प्राणी चित्रविचित्र आवाज करतात, ओरडतात,एक दुसऱ्याला खाणाखुणा करतात! काही प्राण्यांची अवस्था तर अत्यंत वाईट असते, चरता चरता देखील त्यांना वाघ आल्याचा भास होतो,आणि ते इतर प्राण्यांना चुकीचे सिग्नल देतात. कारण असते,वाघाची भिती!!! राजसाहेबांचे महाराष्ट्र दौरे सुरु झाले की त्यांच्या विरोधकांची अवस्था अशीच काहीशी होते.
    राजसाहेब सध्या मराठवाडा दौऱ्यात आहेत आणि तिथे पत्रकारांनी या विषयी प्रश्न विचारले असता, राजसाहेबांनी रोखठोक शब्दांत प्रतिक्रिया दिली आणि या पद्धतीच्या पत्रकारितेचा समाचार घेतला."अश्या पद्धतीचे विधान आमच्यापैकी कोणत्याही नेत्याने अथवा प्रवक्त्याने केलेले आहे का? मग  कन्हैय्याला मनसेचा पाठींबा आहे का, हा प्रश्न येतो कोठून?प्रश्न हेच निर्माण करणार,आणि उत्तरं आमच्याकडे विचारणार."या पत्रकार परिषदेला 'जय महाराष्ट्र'या वाहिनीचा प्रतिनिधी होता हे विशेष त्याला राजसाहेबांनी विचारलं की "तुमच्याशी या विषयावर पक्षातून बोललं कोण?"यावर त्या प्रतिनिधी
कडे उत्तर नव्हतं.त्यावर पुढे राज
साहेब म्हणाले "तुम्ही बातम्या बेधडक टाकून द्यायच्या आणि त्याची उत्तरं आम्ही द्यायची?. तुमच्या ऑफिसने आमच्यावतीने स्टेटमेंट काढायची आणि आम्हाला उत्तरं विचारायची?. ही कुठली तुमची नवीन पत्रकारिता आता'. असा टोला देखील हाणला.
'कन्हैय्याला मिळणार मनसेचे कवच' या जय महाराष्ट्रच्या मथळ्यावर,उपरोधिक टीका करताना राजसाहेब म्हणाले, "कार्यक्रम त्यांचा आणि मी कशाला कवच देऊ, कवचाची फॅक्टरी आहे का माझी?".

सुट्टयांमध्ये काय कराल

   सुट्टयांमध्ये टाइमपास म्हणजे फेसबुकवर वेळ घालवणे. याच जोडीला आपण अशा काही गोष्टी करु शकतो,ज्यामुळे आपल्याला भविष्यात आपल्या करिअरला त्याचा फायदा होऊ शकतो.यासाठी तुम्हाला कुठल्याही वक॑शाॅपला जाण्याची गरज नाही.
ब्लॉगर.कॉम -आपल्या मनातील भावना,वाचनात येणा-या चांगल्या गोष्टी आपल्या आवडीच्या गोष्टी लिहून ठेवाव्याशा वाटतात.तर तुम्ही या वेबसाईटवर ब्लॉग तयार करू शकता. त्या ब्लॉगची डिझाइन आणि त्यातले आटि॑कलही सेट करू शकता.ही फ्री वेबसाईट आहे आणि जर तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना पोहोचवयाचा असेल, तर गुगलने अॅडसेन्स असा प्रोग्राम काढला आहे ज्यात तुम्ही प्रत्येक महिन्याला काही ठराविक रक्कम गुगला देऊन तुमच्या ब्लॉगला जास्तीत जास्त पोहचवू शकता.
फेसबुकवर पेज - फेसबुकवर तासन्तास वेळ घालवित असतांना आपण आपल्या आवडीच्या विषयावर ऐखादं फेसबुकवर पेज तयार करून त्यावर जास्तीत जास्त लाइक्स आणि कमेंटस मिळवू शकता एखाद्या विषयावर अधिक संवाद घडवून आणला जाऊ शकतो.
टि्वटर - आपले विचार थोडक्या शब्दात लोकांना पोहोचवयाचे असल्यास याचा वापर करू शकतो फाॅलोअस॑ मिळवू शकतो तसेच त्यांच्याशी  संवाद साधू शकता  फेसबुक पेज  लिंक करू शकता
युटयूब - तुमच्यातील कला लोकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सध्या याकडे पाहिले जाते 'कोलावेरी डे' या गाण्याचे यशही या वेबसाईटमध्येच दडले आहे. तुम्ही तुमची कला सादर करुन आपल्या आवडीच्या क्षेत्रात चांगली संधीही मिळू शकते.
वीबली.कॉम - विविध एलिमेंट्स व्हिडीओज फोटो गॅलरीज मॅप्स आणि इतर फीचस॑ यात तुम्हाला मिळेल पस॑नल आणि बिझनेस वेबसाइट्स तयार करू शकता तसेच त्या वेबसाईटला प्रोफेशनल लूक देता येतो ज्यांना वेबसाइट डिझाइन करण्याची आवड आहे अशा लोकांनी याची मदत घेऊन काम करण्यास काहीच हरकत नाही
टुम्बलर.कॉम - तुम्हाला भांरभार लिहायला आवडत नसेल आणि टि्वटरपेक्षा जास्त स्पेस हवी असेल तर तुम्ही micro ब्लॉगिंगचा पयार्य स्वीकारू शकतात या साठी त्याचा वापर करू शकतो यात डॅशबोड॑ टॅगिंग असे अनेक फीचस॑ आहेत आपला ब्लॉग चांगल्या प्रकारे लोकांनासमोर सादर करता येतो.
फेसबुकवर तासन्तास वेळ घालवित असताना आपण आपली कौशल्ये विकसित करू शकतो आणि तुमचे टॅलेण्ट इतर लोकांनासमोर आणण्यासाठी अशा सोशल वेबसाईट्सचा वापर करता येतो आणि सुट्टी सार्थकी लावता येऊ शकते मग मित्रांनो सुट्टीत मज्जा मस्ती याच बरोबर थोडावेळ या
साठी खर्च केला तर तुमच्या करिअरला नक्कीच फायदा होऊ शकतो.

आठवले का ते क्षण

आणि तेव्हा पुरुषाचा बाप होतो

मन तुझे झालेबापमाणुसबायको "गोड बातमी" सांगते ते ऐकून टचकन डोळ्यात पाणी येतेतेव्हा पुरुषाचा बाप होतो...
नर्स ने ओंजळीत ठेवलेला काही पौंडाचा जीव जबाबदारीच्या प्रचंड ओझ्याची जाणीव करून देतो,तेव्हा पुरुषाचा बाप होतो....
बायकोबरोबर जागवायच्या रात्री डायपर बदलणे आणि पिल्लाला कडेवर घेऊन फेऱ्या मारण्यात व्यतीत होउ लागतात,तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
मित्रांबरोबरच्या पार्ट्या आणि नाके नीरस वाटून संध्याकाळीपावलांना घराची ओढ लागते,तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
"लाईन कोण लावणार" म्हणत सिनेमाची टिकिटे टेचात ब्लॅकने खरेदी करणारा तोच जेव्हा शाळेच्या फॉर्मच्या लायनीत पहाटे पासून तासंतास इमानदारीत उभा रहतो,तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
ज्याला उठवताना गजर हात टेकतात तोच जेव्हा पिल्लाचा नाजुक हात किंवा पाय झोपेत आपल्या अंगाखाली येऊ नये म्हणून रात्रभर सावध झोपू लागतो,तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
खऱ्या आयुष्यात एका झापडित कुणालाही लोळवू शकणारा पिल्लाबरोबरच्याखोट्या फाइटिंग मध्ये त्याच्या नाजुक चापटीनेदेखील गडाबडा लोळतो,तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
स्वतः कमीजास्त शिकला असला तरी पोराला "नीट अभ्यास कर रे" असे पोट तिडकिने सांगू लागतो,तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
आपल्याच कालच्या मेहनतीच्या जोरावर आपला आज मजेत जगणारा अचानक पोराच्या उद्यासाठी आपलाच आज कॉम्प्रोमाइज करू लागतो,तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
ऑफिसात अनेकांचा बॉस बनून हुकुम सोडणारा शाळेच्या POS मध्ये वर्गशिक्षिकेसमोर कोकरु बनून, कानात प्राण आणून तिच्या इंस्ट्रक्शन्स अज्ञाधारकपणे ऐकतो,तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
आपल्या अप्रेझल आणि प्रमोशनपेक्षासुद्धा तो शाळेच्या साध्या यूनिट टेस्टच्या रिझल्टची देखिल जास्त काळजी करू लागतो,तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
आपल्या वाढदिवसाच्या ट्रीट पेक्षा पोराच्या बर्थडे पार्टीच्या तयारीत तो गुंगुन जातो,तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
गाडीतून सतत फिरणारा तो पोराच्या सायकलची सीट पकडून सायकलच्या मागे धावू लागतो,तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
आपण पाहिलेली दुनिया, केलेल्या चूका पोराने करू नयेत म्हणून प्रिचिंग सुरु करतो,तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
प्रसंगी पोराच्या कॉलेज अडमिशनसाठी पैशाची थैली सोडतो किंवायाचनेकरिता "कॉन्टेक्ट्स" समोर हात जोडतो,तेव्हा पुरुषाचा बाप होतो..."
तुमचा काळ वेगळा होता, आता जमाना बदलला, तुम्हाला काय कळणार नाही. This is generation gap!" असे आपणच केव्हातरी बोललेले संवाद आपल्यालाच ऐकू आल्यावर आपल्या बापाच्या आठवणीने हळवा होऊन मनातल्या मनात त्याची माफी मागतो,तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
पोरगा शिकून परदेशी जाणार, मुलगी लग्न करून परक्या घरी जाणारहे दिसत असून त्याकरिता स्वतःच प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा पुरुषाचा बाप होतो....
पोर मोठी करताना आपण कधी म्हातारे झालो हे लक्षात येत नाही आणि लक्षात येते तेव्हा उपयोग नसतो,तेव्हा पुरुषाचा बाप होतो...
कधी पोरांच्या संसारात अडगळ बनून, कधी आपल्या म्हातारीबरोबर वृद्धाश्रमाची पानगळ बनून, अगदीच नशीबवान असला तर नातवंडांसमवेत चार दिवस रमून...कसेही असले तरी भावी पिढीला भरभरून आशीर्वाद देत कधीतरी सरणावर चढतो,तेव्हा पुरुषाचा बाप होतो...!!!!

लक्ष असू द्या

कोकणाची मुंबई होऊ देऊ नका,...
जास्त पैशासाठी आपल्या जमिनी परप्रांतीयाना विकु नका..
  आपल्या गावी कोणत्याही भाषेचे, जातीचे, धर्माचे लोक आली, तर त्यांची उठाबस करायची, त्यांना काय हवे नको ते पाहायचे, पण त्यांच्या गोड स्वभावाला किंवा पैशाला बळी पडून त्यांना आपल्या गावातील भूमी विकाची नाही.
त्याबद्दल जागरूक रहा, " येवा कोकण आपलाच असा " बोलत बसू नका. आपलं गांव तरी आपल्या ताब्यात ठेवा, गाव म्हणजे फक्त आपल्या घरची मंडळी आणि
घरापुढचे अंगण आणि गाडी पार्किंग ची जागा नाही, गांव म्हणजे गावांत राहणारी आपली सर्व माणसे, आपली भाषा आपले राज्य आपले देव आपली देवळं,आपल्या शेती.
कोकण मध्ये दुहेरी रेल्वे मार्गासाठी परवानगी मिळाली आहे, त्यामुळे अजून परप्रांतीय लोंढे आपल्या गावी येऊन भूमी विकत घेणाच्या विचारात असतील, आपल्या भूमी आपल्याच मराठी माणसाला विका. नाही तर उद्या तुमच्या नातवाला तुमचं गांव म्हणजे मुंबईच वाटायची.
लक्ष असू दया...

उष्माघात

उष्माघात...
उन्हामुळे मृत्यू का होतो?
दिल्लीपासून आंध्रापर्यंत...
शेकडो लोक उष्माघाताने मरत आहेत.
आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?
👉 आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात
👉 घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे.
👉 पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं
👉 जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.
👉 शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!)
👉 स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात.
👉 रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.
👉 माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.
👉 उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे.
Hot & cold food list
सफरचंद               - थंड
चिकू                     - थंड
संत्री                     - उष्ण
लिंबू                     - उष्ण
कांदा                    - थंड
बटाटा                   - उष्ण
पालक                   - थंड
टॉमेटो                   - उष्ण
कारले                   - उष्ण
कोबी                    - थंड
गाजर                   - थंड
मिरची                   - उष्ण
मका                     - उष्ण
मेथी                     - उष्ण
वांगे                      - उष्ण
भेंडी                     - उष्ण
बीट                     - थंड
बडीशेप                 - थंड
वेलची                   - थंड
पपई                     - उष्ण
अननस                 - उष्ण
डाळींब                 - थंड
ऊस                    - उष्ण
मीठ                     - थंड
मूग डाळ               - थंड
चणा डाळ             - उष्ण
गुळ                     - उष्ण
तिळ                    - उष्ण
शेंगदाणे / बदाम / काजू / अक्रोड / खजूर     - उष्ण
हळद                   - उष्ण
कॉफी                  - थंड
दूध / दही / तूप / ताक / तांदूळ                  - थंड
उन्हाळ्यात थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास होणारा त्रास कमी होतो.
             🏻

आधुनिक मामाचे गाव

आधुनिक मामाचा गाव 
झुक झुक झुक आगीनगाडी 
धुरांची रेषा विसरून गेली
एसीचे डबे बुक करूया मामाच्या गावाला जाऊया
मामाचा गाव हाय मोठा
मॉल बझारला नाही तोटा
ऑन लाईन शॉपिंगही करूया मामाच्या गावाला जाऊया
मामा मोठा पगारदार
घेऊन येई ऑडी कार
लाँग ड्राईवला जाऊया
फोर व्हिलर शिकूया
मामाच्या गावाला जाऊया
मामाची बायको शिकलेली
व्हाट्सअप मध्ये गुंतलेली
तिला जोक पाठवूया
रूसलेली मामी हसवूया  मामाच्या गावाला जाऊया
मामाची बायको चटपट 
रोज रोज मॅगी झटपट
पिझ्झा बर्गर खाऊया  मामाच्या गावाला जाऊया

मैत्रीण पाहिजे

मैत्रीण पाहिजे अशी
कधी कधी तिढ्यात
कधी कधी कोड्यात
कधी गोडीत बोलणारी...
मैत्रीण पाहिजे अशी
कधी सुख वाटणारी
कधी दु:ख वाटणारी
कधी समजून घेणारी...
मैत्रीण पाहिजे अशी
कधी आपलंस करणारी
कधी अश्रु पुसणारी
कधी कधी झापणारी..
मैत्रीण पाहिजे अशी
नेहमी मन जाणनारी
ह्रदयात बसणारी
गालात हसणारी..
मैत्रीण पाहिजे अशी
वाट दाखवणारी
कौतुकाने पाहणारी
संकटात हात देणारी...
मैत्रीण पाहिजे अशी
ओठावर हसु आणनारी
कधी डोळे वटारणारी
चुकलं तर कान धरणारी...
मैत्रीण पाहिजे अशी
जीवाला जीव देणारी
कधी भाव खाणारी
कधी भाव देणारी...
मैत्रीण पाहिजे अशी
कधी तिखट बोलणारी
कधी तिखट वागणारी
कधी गोडी लावणारी...
मैत्रीण पाहिजे अशी
मंजुळ पाव्यासारखी
दुधाच्या खव्यासारखी...

क्षणभर विश्रांती..........

दुपारच्या कडक उन्हाच्या वेळी मी व्हरांड्यात बसलो होतो.तेवढ्यात, माझ्या घराच्या कंपाउंडमध्ये एक थकल्या सारखा दिसणारा परंतु, धष्टपुष्ट कुत्रा शिरला.त्याच्या
गळ्यातील पट्ट्याकडे आणि सुदृढ़ शरीराकडे पाहुन वाटते होते की, हा कुणा चांगल्या घरचा पाळीव कुत्रा आहे.मी त्याला जवळ बोलावून त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.
तो शेपुट हालवत तिथेच बसून राहीला.मी उठून घरात निघालो, तसा तोही मागोमाग हाॅल मध्ये आला आणि खिडकीशेजारील एका कोपऱ्यात शहाण्यासारखा पाय दुमडून,पुढील दोन पायात तोंड खुपसून बसला.पाहता पाहता झोपीही गेला.मी पण हाॅलचे दार बंद करून सोफ्यात बसून राहिलो.
तासाभराने तो उठून दाराकडे निघाला.मी ही उठून दार उघडले.तो सरळ कंपाउंड बाहेर गेला.बहुधा, त्याच्या घरी गेला असावा! दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच वेळेला तो आला.तसाच हाॅलच्या कोपऱ्यात झोपला.तासाभराने उठून निघून गेला.
     मग हे रोजचेच झाले.तो यायचा, झोप काढायचा आणि निघून जायचा.असे कित्येक आठवडे झाले.मला उत्सुकता लागुन राहिली, हा नेमका कुणाचा आहे ?मी एके दिवशी त्याच्या पट्टयात एक चिठ्ठी लिहुन अडकवली,"तुमचा कुत्रा माझ्याकडे रोज येऊन झोप काढतो, हे तुम्हाला माहीत आहे का?" दुसऱ्या दिवशी पुन्हा रोजच्याच वेळेला तो कुत्रा आला. पण, यावेळी त्याच्या पट्ट्याला एक चिठ्ठी दिसत होती. मी ती काढून वाचू लागलो.....
"टॉमी एक चांगल्या घरचा कुत्रा आहे. इथे माझ्या सोबतच राहातो. पण, माझ्या बायकोच्या अखंड वायफळ बडबडीला कंटाळून, थोडीशी तरी झोप मिळावी म्हणून रोज तुमच्याकडे येतो....उद्यापासुन मी पण त्याच्या सोबत येत जाऊ का ?
चिठ्ठी लावून कळवणे!"

आणि पहिली रेल्वे धावू लागली...

पहिली रेल्वे मुबई ते ठाणे धावू लागली !!
१६ एप्रिल १८५३ जगातील पहिली रेल्वे इंग्लंडमध्ये १८२५ च्या सुमारास धावल्यानंतर इ.स. १८४४ मध्ये हिंदुस्थानात आगगाडी सुरू करावी असा प्रस्ताव जगन्नाथ शंकरशेठ यांनी ब्रिटीशांकडे मांडला. ३१ ऑक्टोबर १८५० रोजी शीव येथे पहिली कुदळ मारून रेल्वेच्या बांधकामाला प्रारंभ झाला. जवजवळ४५ लाख रुपये खर्च करून मुंबई-कल्यामपर् यंतचा रेल्वेमार्ग सुरू करण्याचे पूर्ण श्रेय लॉर्ड डलहौसीला दिले जाते ते चुकीचे आहे , कारण त्यासाठी फार मोठे कष्ट नानांनीच घेतले आहेत. वाद हे त्या काळीही होते. मीटर गेज रेल्वे असावी की ब्रॉड गेज यावर तेव्हा वाद झाला.
१५ ऑगस्ट १८५४ रोजी कलकत्त्याला, ३ फेब्रुवारी १८५५ रोजी राणीगंज असा रेल्वे प्रवास सुरूझाला. तथापि १६ एप्रिल १८५३ रोजी हिंदुस्थानातील पहिली रेल्वे मुंबईत धावली. लोकांनी या पहिल्या रेल्वेचे स्वागत कसे केले हे ऐकल्यावर आजच्या पिढीलानक्कीच आश्चर्य वाटते.
१६ एप्रिल १८५३ रोजी मुंबईकरांचा गोंधळ उडाला होता. आज ते एक चमत्कार पाहणार होते. साहेबाचे पोर बिनबैलाची गाडी हाकणार होते. या शुभदिनी मोठमोठे साहेब , नेटिव्ह उपस्थित होते. १८ डबे आणि तीन महाकाय इंजिन असलेल्या या पहिल्या रेल्वे प्रवासाचा आनंद ५०० लोकांनी लुटला. आपापल्या दर्जानुसार लोक गाडीत बसले होते.
नामदार यार्डली , जज्ज चार्लस् जकसन तसेच नाना शंकरशेठ ही मंडळी उपस्थित होती. गव्हर्नर लॉर्ड फॉकलंड यांनी या ऐतिहासिकसोहळ्यावर बहिष्कार घातला होता.पण त्यांच्या पत्नी मात्र या समारंभास उपस्थित होत्या.आणि १६एप्रिल १८५३ ला दुपारी ३.३० वाजता इतिहास घडला. तोफांची सलामी देण्यात आली. गार्डने शिट्टी वाजवून हिरवा बावटा दाखविल्याबरोबर त्या राक्षसी आकाराच्या तीन इंजिनांनी कर्णभेदी भोंगे वाजवले. त्या इंजिनांच्या धुरांचे लोळ ढगांप्रमाणे भासत होते. काळे पोषाख घातलेले इंजिनाच्या पोटात असलेले खलाशी , फावड्याने कोळसा आगीत लोटत होते. त्या तीन राक्षसी अजस्र इंजिनांनी चमत्कार घडवला. ती गाडी चक्क चालू लागली.
लोक बोलू लागले की , पुराणकाळात आपण अद्भूत चमत्काराच्या गोष्टी नुसत्याच ऐकतो. पण आता कलियुगात इंग्रज त्या प्रत्यक्षात करून दाखवतात. इंग्रजांचा राजा देवाचा अवतार , अशी लोकांची समजूत झाली. परिणामी ते अद्भूत दृश्य पाहून लोकांनी हात जोडून लोटांगण घातले. गाडीचा वेग , शिट्ट्यांचा आवाज याने लोक भयचकित तर झालेच , पण गायी , बैल भेदरले आणि कुत्रे पिसाळल्यासारखे भुंकू लागले. एकीकडे लष्करी बँडही निनादत होता.
मुंबई ते ठाणे हे अंतर कापायला गाडीने तब्बल ५७ मिनिटे घेतली. यामध्ये गावागावात लोक तिच्या स्वागताला तयार होते. गाडी भायखळ्याजवळ आली तेव्हा तिच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती. लोक दाटीवाटीने गच्चीवर , डोंगरावर उभे राहून या चमत्काराला नमस्कार करत होते आणि ४.५८ वाजता गाडी ठाणे स्टेशनावर पोहोचली , तेव्हा तिच्या स्वागतासाठी ठाण्यात भव्य शामियाना उभारण्यात आला होता. सर्व पाहुण्यांना शाही मेजवानी देण्यात आली. तेथे प्रतिष्ठितांची भाषणे होऊन ६.३०वाजता ठाणे सोडून बरोबर ५५ मिनिटे आगीची गाडी बोरिबंदर स्टेशनावर पोहोचली. तर असा होता पहिल्या आगगाडीचा प्रवास कोणत्याही चमत्काराला दैवत्व बहाल करणा-या भारतीयांनी या गाडीचे नामकरण केले , ‘ चाक्या म्हसोबा’.
रेल्वे हे क्रांतीचे प्रभावी हत्यार ठरले. इंग्रजांनी रेल्वेआणली ती त्यांच्या फायद्यासाठी.१८५७ चा उठाव दडपण्यासाठी रेल्वे ही फार मोठी शक्ती होती. स्वातंत्र्यप्रा प्तीनंतर भारताची रेल्वे आशिया खंडात सर्वात मोठी तर जगात आज पाचव्या क्रमांकावर आहे.
आज आपल्या लोहमार्गाची लांबी नऊलाख किलोमीटरच्या आसपास आहे. 2016 च्या सुमारास भारतात रेल्वेयुग अवतरून 163 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने 163 वर्षापूर्वीच्या इंजिनाला डबे जोडून तशाच प्रकारचा दिमाखदार सोहळा केला , तो पाहायलाही हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते.
भारतीय रेल्वेच्या वाढदिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

काय चुकलं

क्रिकेट समालोचनाबद्दल बोलायचं झाल्यास सवा॑त प्रसिद्ध आणि लोकप्रिय समालोचक कोण असा प्रश्न जर कोणाला विचारला तर सर्व लोकांच्या समोर येतो तो म्हणजे हष॑ भोगले आणि खरंच हर्ष भोगले यांच्यातही हा ‘प्रोफेशनॅलिझम’ आपणास पाहायला मिळतो. क्रिकेटवरचं प्रेम,भाषेवरचं प्रभुत्व, कामावरची श्रद्धा, जबाबदारीचं भान आणि क्रीडाक्षेत्राची जाण,या गुणांवर त्यांनी जगभरातील क्रिकेटचाहत्यांच्या मनात प्रेमाचं – आदराचं स्थान निर्माण केलंय.
     एखादा भाविक प्रवचनात जसा तल्लीन होतो रमतो,तितक्याच तन्मयतेनं त्यांची ‘कॉमेन्ट्री’ ऐकणारे एक नाही तर अनेक क्रिकेटप्रेमी आपणास पहायला मिळतील.असं असतानाही देखील,कुठलंही कारण न देता बीसीसीआयनं त्यांना आयपीएल स्पर्धेपासून दूर ठेवल्यानं सगळ्यांनाच धक्का बसलाय.कटप्पाने बाहुबलीला का मारलं? या प्रश्नांप्रमाणेच हर्ष भोगलेंचं काय चुकलं? हा प्रश्न आज अखिल क्रिकेटविश्वाला पडलाय. सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी,तो धोकेबाज कधीच नसतो त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच…! कटप्पाने बाहुबली का मारले याचे उत्तर सिनेमाच्या दुसऱ्या भागात कळेल पण भोगले यांचे काय चुकले या प्रश्नाचे उत्तर मात्र आम्हाला कोण सांगणार?

नक्की वाचा नाना पाटेकरांचा ब्लॉग

नाना पाटेकर यांचा ब्लॉग वाचायलाच हवा असा......         शिर्डी साईबाबा  : प्रत्येक वर्षीचे मिळणारे डोनेशन - ३५० करोड  + सोने  ३२  करोड, + गुंतवणूक ४२७ करोड 
-----------------------------------------------------------------
सिद्धीविनायक , मुंबई
पैसे - २००  करोड , FD : १२५ करोड.
-----------------------------------------------------------------
लालबागचा राजा :
१८  करोड कमाई फक्त  गणपतीच्या  १०  दिवसातली.
-----------------------------------------------------------------
गावाकडे दोन रुपये हरवले तर पोराला घेऊन भर उन्हात तो अर्धा दिवस हुडकत बसणारे शेतकरी/मजूर मी स्वतः पाहिलेत अन - त्याच मजुरांना देवाच्या दानपेटीत सढळ हाताने  5-10 रुपये टाकतानाही पाहिलंय.
फक्त 3 देवांची वेल्थ हजार करोडच्या आसपास आहे. 12-12 हजारासाठी आत्महत्या करणारे शेतकरी एका बाजूला अन .
एका बाजूला .
स्वतःची अजिबात परिस्थिती नसूनही देवाला साडी -चोळी-पोशाख  करणारे, दान टाकणारे, आजवर देवांच्या दानपेट्या भर-भरून देणारे गरीब शेतकरी
--स्वतः जेव्हा त्रासून दुर्दैवाने आत्महत्येच्या निर्णयाला पोचतात तेव्हा हिच देवस्थाने आरामात आपला बँकेत ठेवलेल्या FDचे व्याज चाखत बसलेली असतात ??
मग ह्या गरिबांना मरताना सुद्धा २ रुपयाची मदत न करणाऱ्या विठ्ठल-तुळजाभवानी-स्वामी समर्थ-सिद्धिविनायकाला मी
' भिकारी ' का म्हणू नये?
मी पत्रकार नाही, जो विचार मनात जन्मला - तो आहे असा Raw स्वरुपात समोर मांडला,
एखाद्या पत्रकार अथवा सच्च्या समाजकारण्याने जर या सगळ्या मंदिराचा आतापर्यंत फुकट मिळालेला पैसा अन गुंतवणूक बाहेर काढायची ठरवली तर जो आकडा समोर येईल तो Digest करायची आपल्या कोणात ताकद आहे का?            
मुळात एवढा पैसा आला कोठून?
देव कामाला गेले होते की पुजारी कामाला गेले होते, का मंदिराचे विश्वस्थांनी  कामाला जाऊन हे करोडो रुपये घाम गाळून कमवून आणले?
लोकांचाच पैसा ना हा? मग आता दुष्काळात, गरज असताना लोकांनाच हा पैसा थोडासा मदत म्हणून दिला तर काय फरक पडला ?
हि फक्त ३ देवांची नावे होती–
आळंदी- देहू- भीमाशंकर- अष्टविनायक- महालक्ष्मी- सप्तशृंगी- शनी अन शिखर शिंगणापूर-सिद्धेश्वर यांचा आजवरच्या दानपेटीतला पैसा किती असेल ???
अन छोटी-छोटी तर हजारो मंदिरेच आहेत आपल्या देशा –राज्यात--- त्यांचे पैसे किती?
मुळात हा पैसा -म्हणजे नेमका कोणाचा आहे? देव स्वतःकडे ठेवतो का हा पैसा? कि बाकीचेच लोक वर्षानुवर्षे देवाच्या नावावर हा पैसा हाणतात?
दोन मिनिट असं मानलं कि  भक्तांची सोय करतात, तर तसंही नाही.
अक्कलकोट, पंढरपूर, गाणगापूरचे –गावातले सोडा नुसते मंदिराशेजारचेच रस्ते पहा, देवाच्या गावात असूनही तोंडातून आपसूक शिवी निघून जाईल अशी परिस्थिती!
माझ्या इथ ओरडण्याने काहीच होणार नाही याची पुरेपूर जाणीव आहे मला…
पण एक दिवस आज जन्मलेल्या या विचाराचा फायदा या-पैशाच्या-खऱ्या-मालकांना- गरीब शेतकर्यांना १०० टक्के मिळवून देईन –हे मात्र नक्की…
नाना पाटेकर

प्रसंगच तसा होता

राजमहालाच्या दारात मोठा गदारोळ उडाला होता.
जवळपास सगळी नगरी तिथे लोटली होती.

प्रसंगच तसा होता.

त्या दिवशी भल्या सकाळी एक भिक्षुक राजाच्या महाली
भिक्षा मागण्यासाठी आला होता.
राजा म्हणाला, तू पहिला याचक आहेस आजच्या दिवसातला.
काय हवं ते माग. मिळेल.
भिक्षुक म्हणाला, माझ्याकडचं भिक्षापात्र फारच छोटं आहे.
त्यात बसेल एवढीच भिक्षा मला पुरेशी आहे.पण, वचन देण्याआधी विचार कर.जमेल का?भिक्षुकाच्या हातातलं अतिशय छोटं भिक्षापात्र पाहून राजा हसून म्हणाला,अरे याचका,माझ्याकडच्या संपत्तीची गणती नाही,माझ्या राज्याला सीमा नाही. हे छोटंसं भिक्षापात्र भरण्यात काय अडचण.राजाने नोकरांकरवी आपल्या खजिन्यातले उत्तमोत्तम जडजवाहीर मागवले आणि त्यांनी ते भिक्षापात्र भरायला सांगितलं...संध्याकाळ उजाडली तरी ते भरणं सुरूच होतं...राजाचा सगळा खजिना रिता झाला होता,आपल्या लाडक्या राजावर खजील होण्याची पाळी यायला नको,म्हणून प्रजाजनांनी आणलेली त्यांच्या घरची संपत्तीही त्यात गायब झाली होती.रात्र झाली तसा राजा भिक्षुकाच्या पायावर कोसळला आणि म्हणाला,
महाराज, माझ्याकडे हे पात्र भरण्याइतकी संपत्ती नाही.
भिक्षुक म्हणाला, अरेरे, उगाच माझा दिवस वाया गेला. सकाळीच सांगितलं असतं तर पुढे गेलो असतो.पात्र उलटे करून सगळी संपत्ती ओतून तो पुढे निघाला.
    राजा धावत त्याच्या मागे गेला आणि हात जोडून त्याने विचारलं,
भगवन्, मला फक्त एक सांगा. या इतक्याशा भिक्षापात्रात माझा सगळा खजिना रिता झाला, तरी ते भरलं नाही. असं काय आहे या भिक्षापात्राचं वैशिष्ट्य?भिकारी म्हणाला, ते मलाही माहिती नाही.
हे भिक्षापात्र मी माणसाच्या कवटीपासून तयार केलं आहे.
त्यातच माणसाचं मन असतं म्हणतात.आणि ते कशानेही भरत नाही.

निदान आता तरी

मंदिर प्रवेश नव्हता तरी माॅसाहेब जिजाऊ 'राजमाता' झाल्या.मंदिर प्रवेश नसला तरी सावित्रीबाई 'क्रांतीज्योती' झाल्या.मंदिर प्रवेश नव्हता तरी लक्ष्मीबाई झाशीच्या 'राणी' झाल्या.मंदिर प्रवेश नव्हता तरी लतादीदी हिंदुस्थानच्या 'गानकोकिळा' झाल्या.मंदिर प्रवेश नव्हता तरी आनंदीबाई जोशी पहिल्या महिला डाॅक्टर झाल्या.
मंदिर प्रवेश नव्हता तरीही कल्पना चावला पहिल्या महिला अंतराळवीर झाल्या.आणि मंदिर प्रवेश नव्हता तरीही प्रतिभाताई देशाच्या पहिल्या महिला 'राष्ट्रपती' झाल्या.मंदिर प्रवेश नसला तरी सिंधुताई अनाथांच्या माय झाल्या.
..
..
..
तृप्ती देसाई,
तुम्हाला मंदिर प्रवेश मिळालायं.
निदान आता तरी आपल्या देशात अनेक समस्या आहेत दुष्काळ, शेतकरी बांधवाचे आत्महत्या,दारूबंदी व डान्सबार बंदी त्या विषयी आवाज उठवा आणि लढा आम्ही तुमच्या सोबत असू.
  आज राम नवमी...राम नवमीच्या शुभेच्छा...
देवा कडे पाणी मागितले तर समुद्र दिला !!!
फुल मागितले तर बागच दिली !!!
घर मागितले तर राजवाडाच दिला !!!
आणी मग.....
देवापाशी देवच मागितला तर.....
त्यांनी तुमच्यासारखे गोड माणसे दिली !!!

महाराष्ट्राचा नंबर कधी येणार

     चार हजार कोटी महसुलावर पाणी घालीत बिहारमध्ये संपूर्ण दारू बंदी लागू करण्याच्या धाडसी निर्णय घेतला आहे.तर महाराष्ट्रात डान्स बार बंदी उठली.दारू मुळे कुटुंब उध्दवस्त होत असल्याने विदेशी दारू पिण्याची,विक्रीची आणि व्यवसायाची बंदी घालण्यात आली आहे. गुजरात,केरळ आणि नागालँडसह दारूबंदी करणारे बिहार हे देशात चौथे राज्य ठरले आहे. महाराष्ट्रचा निदान पाचवा नंबर लागेल का किंवा पहिल्या दहामध्ये तरी महाराष्ट्राचा नंबर लागेल अशी आम्ही अपेक्षा करतो बिहार मध्ये दारूबंदी होते तर महाराष्ट्रात का नाही.महाराष्ट्रात दारू पिणा-यांचे आरोग्य जपले जाते का?
    महसुलासाठी आणखी किती जणांचा बळी तुम्ही घेणार आहोत? महाराष्ट्रात काही जिल्ह्यात दारूबंदी आहे तेंव्हा संपूर्ण राज्यात दारूबंदी करणे गरजेचे आहे. तशी हिंमत दाखवावी. दारूपासून मिळणा-या उत्पन्नाकडे निधीचा स्तोञ म्हणून बघणे चुकीचे आहे.त्या निमीत्ताने पाण्याची बचत होईल.

तूच तुझी वैरी

बायकांना थोडा राग येईल.पण काही ठिकाणी वस्तुस्थिती आहे आमच्या अहिराणी बोली भाषेतील एक कविता
पण ' तूच तुझी वैरी '
स्त्री पुरुष समानता
विचार मले पटते
खरं सांगतो बाईच
बाईच्या जिवावर उठते
माणसानं म्हणतात
मागं ठेवल्या बाया
पण एका हातानं सांगा
वाजतात का टाया
बाईचं सुख पाहुन
बाईच आतून पेटते
खरं सांगतो बाईच
बाईच्या जिवावर उठते
बाईच्याच बोटावर
माणूस नाचत असतो
कसा काय बाईले तो
कमी लेखत असतो
जागो जागी आपल्याले
हेच दिसत असते
खरं सांगतो बाईच
बाईच्या जिवावर उठते
एस. टी.त बाईले
माणूस जागा देईन
पण बाई मात्र बाईले
तशीच ऊभी ठेईन
आणखीनच ते आपलं
फतकल मांडून बसते
खरं सांगतो बाईच
बाईच्या जिवावर उठते
पोराच्या लग्नात
हुंडा कोण मागते
पोराची माय सारं
घरूनच सांगते
सून घरी आली की
सासूलेच खूपते
खरं सांगतो बाईच
बाईच्या जिवावर उठते
एक दिवस माह्या घरी
सायी माही आली
काय सांगू राज्या मले
लय खुषी झाली
बायकोले बापा माह्या
हे बी खटकते
खरं सांगतो बाईचं
बाईच्या जिवावर उठते
मले वाटलं सायीले
सिनेमाले नेवाव
बायकोची बहीण म्हणून
मागीन ते देवाव
बायकोले वाटे आता
माहा पत्त कटते
खरं सांगतो बाईच
बाईच्या जिवावर उठते
बायकोची बहीण असून
माह्या मनात आदर
तिची बहीण असून तिले
आहे काय कदर
माह्या बहीणीले हे
खलबत्यात कूटते
खरं सांगतो बाईच
बाईच्या जिवावर उठते
नणंदही भावजयवर
गाजवते ठेका
माहा मान मोठा म्हणे
असा तिचा हेका
हीले काही घेतलं की
ते तिकडे फुगते
खरं सागतो बाईच
बाईच्या जिवावर उठते
पोरगा व्हावा म्हणून
बाया हट्ट करतात
देवी देवतांचे त्या
उपवास धरतात
पोरीची संख्या
अशानच घटते
खरं सागतो बाईचं
बाईच्या जिवावर उठते
मुलगा मुलगी होणं
नसते आपल्या हाती
मुलगा असतो दिवा
तर मुली असतात ज्योती
बुद्धीनं मुलगीही
यशोशिखर गाठते
खरं सांगतो बाईच
बाईच्या जिवावर उठते
माणूस म्हणून स्त्री- पुरुष
सारखेच माना
प्रगतीच्या प्रवाहात
दोघायलेही आणा
भेदभावाची दरी मग
आपोआप मिटते
खरं सांगतो बाईच
बाईच्या जिवावर उठते

एक किस्सा

माझे मित्र रविंद् सरांनी सांगितलेला एक किस्सा काल एका मित्राने घरी बोलावले होते.सत्यनारायणाची महापुजा होती त्याच्याकडे.म्हटलं..ठीक आहे..तुझी इच्छाच आहे तर तो शिरा खायला येतो.मला खुप आवडतो..गेलो..!
तो मित्र आणि त्याची बायको पुजेला बसले होते.भटजी साधू वाण्याची कथा सांगत होते.तो मित्र पुजा सुरु असतानाच मंडप-लाईट-डेकोरेटर्सना आवश्यक सुचना करत होता..! आल्या-गेल्या पाहुण्यांची विचारपुस करत होता..! अधेमधे भटजींनी सांगितलेल्या सुचना ऐकत होता..!
अशीच पुजा संपली..आरती झाली.!
मी मित्राला विचारलं,“तु पुजा ऐकत नव्हतास.. आजूबाजूचे कोणीही लक्ष देवून ऐकत नव्हते..मग हे थोतांड कशासाठी..?
तो म्हटला,अरे वेड्या..सत्यनारायण निव्वळ बहाणा असतो रे..लोकांना घरी बोलावण्याचा..केवळ एक निमित्त..हे आमंत्रण सहसा लोक टाळत नाहीत.. म्हणुन..!
म्हटलं,अरे कोपेल ना तुझ्यावर तो अशाने..! म्हटला,अरे सतरा वर्ष झाली..हे करतोय..पुजा एकदाही ऐकली नाही..आणि कोपही झाला नाही..! सत्यनारायणापुढे मी हात जोडले नव्हते..पण या मित्राला मात्र साष्टांग लोटांगण घातले..!!

चचे॑त कसे राहावे

    शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी पुन्हा एकदा साईबाबा आणि साई भक्तांना लक्ष्य केले असून. पूजेस 'अपात्र' असलेल्या साईबाबांची पूजा केल्यानेच महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती उद्भवली आहे, असे वादग्रस्त वक्तव्य करुन आपले हसू करुन घेतले आहे.  शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद पुन्हा चर्चेत आले आहेत. यांना कोण समजून सांगणार की पूजा आरत्या मिरवणुका काढून काही होत नाही. जे वाईट कृत्य कराल ते याच जन्मात फ़ेडावे लागते. यात देव सुद्धा काही करू शकत नाही. आमच्या स्वार्थी वृत्तीने निसर्ग लुटून खाल्ला आता निसर्ग आम्हाला आमची जागा दाखवेल. हा दुष्काळ कुंभमेळ्या मुळे पडला.कुंभमेळ्यात करोडो रुपये खर्च झाले.ते जर दुष्काळ रुपये त्या शेतकऱ्यांना वाटले असते तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या.आणि लाखो लीटर पाणी हे त्या कुंभमेळ्यात वाया गेल ते पाणी मराठवाड्यातील जनता पिली असती....
  आत्ता खरी गरज आहे ती सर्व बाबा महात्मा साधु संत यांनी त्यांचे अस्तित्व सिद्ध करण्याची कारण आश्रमात /मठात बसुन गप्पा करून काही साध्य होणार नाही सर्व बाबांनी व त्यांच्या लाडक्या भक्तानी दुष्काळाची व्याप्ती कमी करण्यासाठी बाहेर येऊन प्रत्यक्ष काम करण्याची गरज आहे पोथ्या पुराण वाचुन दुष्काळ  कमी होणार नाही तर प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे  माझी सर्व स्वयंघोषीत  बाबाजीना कळकळीचे आवाहन आहे की दुष्काळी भागासाठी एवढे केले तरी पुष्कळ आहे  असे केले तर लोक नेहमी तुमच्या सोबत असतील.

एक विनंती आहे

  हा सर्व फळांचा ऋतू आहे. म्हणजेच आंबा ,जांबुळ , सिताफळ इत्यादि . माझी सर्वांना विनंती आहे की या फळांचा जेंव्हा तुम्ही आस्वाद घ्याल व उरलेले  बी कुठेही इतरत्र न टाकता, या बिया स्वच्छ करुन आणि एका प्लास्टिक बॅग मध्ये ठेवा व ती तुमच्या कार (Car) किंवा गाडीमध्ये ठेवा . बरेच लोक या उन्हाळी सुट्टी मध्ये पर्यटनाला जातात. तुम्ही ही गेलाच आणि प्रवासा दरम्यान  जर तुम्हाला ओसाड जागा पहावयास मिळाली तर या बिया तुम्ही त्या ठिकाणी टाकून दया.असे केल्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात या बिया रुजल्या जातील व त्या बियाची नविन रोप तयार होईल.
  अशा पद्धतीने आपल्या सर्वांकडून एका जरी रोपाच ( बियाचे) रूपांतर झाडामध्ये झाले तर आपले Mission पूर्ण होईल .असे प्रयोग खुप वर्षापासून सातारा आणि रत्नागिरी भागामध्ये सुरू  आहेत.
याप्रकारे बाकी अनेक जिल्ह्यांमध्ये अशा  कल्पना लोकांच्या पर्यंत पोहचवुन लोकांना जागृत केल जात आहे आणि कित्येक लोक या मिशन मध्ये सामील ही झाले आहेत....
माझी सर्वाना विनंती आहे व सांगण्यास उत्स्तुकता ही वाटते की आपणही या Mission मध्ये सामील होऊ आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला एका नव्या हिरवळ जगाच. दर्शन घडवू .

पर्यावणाला ग्रहण लागेल

     शहराचे सांडपाणी आणि औद्योगिक कारखान्यांचे रासायनिक पाणी पोटात घेणाऱ्या ठाणे खाडीतील वाढत्या प्रदूषणामुळे येथील ९० टक्क्यांहून अधिक मत्स्यप्रजाती नष्ट झाल्या असल्याची धक्कादायक माहिती एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे. याशिवाय खारफुटी, वनस्पती प्लवंग, प्राणी प्लवंग, शंख, चिंबोरी, कीटक, कोळी, दलदलीय जीवजंतू यांच्या प्रजातीही घटल्या आहेत. एकीकडे खाडीच्या पर्यावरणाला ग्रहण लागले असताना दुसरीकडे खाडी किनाऱ्यावर येणाऱ्या स्थलांतरित पक्षांची संख्या मात्र वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून ठाणे खाडी परिसरात १५५ हून अधिक प्रजातीच्या पक्ष्यांनी हजेरी लावली आहे.ही खूप  आंनदाची बाब असली तरी त्यांपैकी सात प्रजातीच्या पक्ष्यांचे अस्तित्व धोकादायक बनले आहे.त्यामुळे आता प्रदुषण थांबविणे खुपच महत्वाचे ठरणार आहे.   
      प्रत्येकाने आपापल्या परीने समाजात लोकशाहीचा आधारस्तभ म्हणून यशस्वी प्रयत्न केला .त्यात आमचाही खारीचा वाटा या ध्येयाने प्रेरित होऊन आमचा हा अल्पसा प्रयत्न आणि म्हणून आम्ही एक वाचन साहित्य सुरु करीत आहोत.एक हक्काचे व्यासपीठ जे तुमच्या मनात ते आमच्या पानात प्रत्येक वेळी एक वेगळा विषय घेऊन.

शोभेल असे काम करा

वेस्टइंडिज च्या महिला संघाने विश्वचषक जिंकला,भारतातल्या महिला मंदीरात प्रवेशासाठी भांडतात शनी महाराजांच्या चौथऱ्यावर चढण्याचा हट्ट धरण्यापेक्षा....... इतर  अनेक विषय आहेत त्या बद्दल लढा आंदोलने करा  स्त्रीभृण हत्या' थांबवण्यासाठी आंदोलन करा...    दारु बंदी करण्यासाठी आंदोलन करा...नापीक व दुष्काळी परीस्थीती मुळे ज्या महीला शेतकरयाचे कुंकू पुसले जाते त्यांचे कुंकू वाचविण्याचा प्रयत्न करा...
आज ही खेड्यातील बरयाच महीला ह्या अज्ञानी व अप्रगत आहेत. त्यांच्या साठी सावित्री बनून महीला सक्षमीकरण करण्यासाठी शासना कडे हट्ट धरा....धर्मातल्या,चांगल्या परंपरा जपण्याचा हट्ट धरा....
खरचं देव जर महीलांना दर्शन नाकारत असेल तर अशा देवांच्या नादांला लागतातच कशाला...????
हट्ट धरायचाच असेल तर'राजमाता जिजाऊच्या' व सावित्री आई च्या समाधीच दर्शन घ्या...
    जिजाऊ आणि सावित्री बाई जर शनी महाराजांच्या चौथऱ्याचा हट्ट धरत बसल्या असत्या तर शिवछत्रपतींचे 'स्वराज्य' कधीच घडले नसते. व स्त्री शिक्षण पण झाले नसते. उपकार आहे त्या सावित्री माईचे तुम्हावर हे विसरू नका.....!!!!
महाराष्ट्रातील पुरोगामी महीलांना शोभेल अस काम करा......!!!!

हे कधी थांबणार

  प्रत्येकाने आपापल्या परीने समाजात लोकशाहीचा आधारस्तभ म्हणून यशस्वी प्रयत्न केला.त्यात आमचाही खारीचा वाटा या ध्येयाने प्रेरित होऊन आमचा हा अल्पसा प्रयत्न आणि म्हणून आम्ही एक वाचन साहित्य सुरु करीत आहोत.एक हक्काचे व्यासपीठ जे तुमच्या मनात ते आमच्या पानात प्रत्येक वेळी एक वेगळा विषय घेऊन.
    आयपीएलचे सामने महाराष्ट्रात खेळविणे ही दुष्काळग्रस्तांची क्रूर थट्टा आहे .देशांत वर्षभर कुठे नाकुठे कसोटी सामने ,एकदिवसीय सामने आणि T-20 सामन्यांचा उरुस भरलेलाच असतो.मग कुठलेही महत्व नसणाऱ्या या आयपीएलचा तमाशा ऐन  उन्हाळ्यात आणि तोही आपल्यासारख्या दुष्काळग्रस्त देशात अट्टाहासाने भरवण्यात कुठलं शहाणपण आहे ? पैशाला हपालेले हे आयपीएलचे आयोजक इतके संवेदनाहीन कसे? करमणुकीसाठी चालविलेली ही थेरं तात्काळ बंद व्हायलाच हवीत. त्यासाठी आता सरकारनेच कुठल्याही,कोणाच्याही दबावाला बळी न पडता यात हस्तक्षेप करुन हे श्रीमंती चाळे थांबवायला हवेत. आणि हे जर होणार नसेल तर मग आताच्या सरकारमध्ये आणि पूर्वीच्या सरकारमध्ये फरक तो काय राहिला असा सवाल जर दुष्काळग्रस्त जनतेच्या मनात उभा राहिला तर काय चूक?मग खेळपट्टी उखडण्याचे प्रकार तर संताप आणि उद्वेगातून घडणारच; आणि ते समर्थनीय आहेत असंच म्हणावं लागेल.

आपण कोण आहोत

मित्रांनो...
ते म्हणाले सतीची प्रथा चालू रहावी
हे म्हणाले सतीची प्रथा बंद व्हावी
हरले ते आणि जिंकले हे!
ते म्हणाले स्त्रीयांना शिक्षण नको
हे म्हणाले स्त्रींयाना शिक्षण मिळायला हवे
हरले ते आणि जिंकले हे!
ते म्हणाले विधवांचे केशवपनच व्हावे
हे म्हणाले केशवपन बंद झाले पाहीजे
हरले ते आणि जिंकले हे!
ते म्हणाले विधवांचा पुनर्विवाह नकोच
हे म्हणाले विधवांचा पुनर्विवाह झाला पाहीजे
हरले ते आणि जिंकले हे!
ते म्हणाले अस्पृष्यांना समान अधिकार नको
हे म्हणाले अस्पृष्यांना समान अधिकार हवा
हरले ते आणि जिंकले हे!
ते म्हणाले स्त्रियांना संपत्तीत हिस्सा नको
हे म्हणाले स्त्रीयांना संपत्तीत हिस्सा हवाच
हरले ते आणि जिंकले हे!
ते म्हणाले इथे यांना वा त्यांना प्रवेश नको
हे म्हणाले इथे सर्वांनाच प्रवेश मिळालयला हवा
हरले ते आणि जिंकले हे!
जगाचा इतिहास सांगतो
सातत्याने ते हरले
सातत्याने हे जिंकले
ते सतत हरतात आणि हे सतत जिंकतात ...
आपण कोण आहोत?
ते आहोत की हे आहोत...?

यश मिळालं.... मिळेल

         काल जे शनिशिंगनापुरच्या अभूतपूर्व लढ्याला यश मिळालं...आणि ज्या लढ्यासाठी तृप्ती देसाई यांनी आंदोलन केलं...आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या न्यायालयीन लढाईतून हा संवैधानिक विजय प्राप्त झाला आहे.
ही लढाई होती समान अधिकाराची...लढाई होती स्त्री-पुरुष विषमता नष्ट करण्याची...लढाई होती धर्माच्याच नावावर चालणाऱ्या अधार्मिक चुकीच्या प्रथा नष्ट करण्याची...
   आता गम्मत अशी आहे की..
  जे तथाकथित संस्कृतीरक्षक या लढाईला कडाडून...चवताळून...अरेरावीची भाषा वापरून...मिडियात असो...वा सोशल मिडियात असो...आक्रमकपणे विरोध करत होते...आज मात्र तेच 'पहा आमचा हिंदू धर्म कसा लवचिक आहे...सुधारनावादी आहे...सहिष्णु आहे...' या आणि अशा बाता मारताना दिसत आहेत...
  ज्या-ज्या वेळी मन्दिर प्रवेशाचा मुद्दा निघायचा...त्या त्या वेळी या हिंदू संस्कृति रक्षकांना मात्र काळजी मुस्लिम स्त्रियांच्या मश्जिद प्रवेशाची असायची...'त्यांच्यासाठी आधी लढा...'असा उदार(?) हेतु त्यांचा असायचा... स्वतःला हिंदू धर्माचे ठेकेदार समजाणाऱ्या लोकांना आपल्या धर्मातील स्त्रियांच्या समानतेची पर्वा तर नाहीच पण इतर धर्मातील स्त्रियांची एव्हडी काळजी कशी काय बरे...?यांना धर्मद्रोही का म्हणू नये..?
   समजा मुस्लिम भाई-बांधवांनी शनी-शिंगनापुरला हिंदू महिलांना प्रवेश मिळावा म्हणून तृप्ती देसाई यांच्यासारखं मोठं आंदोलन उभं केलं असतं तर या संस्कॄतिरक्षक म्हणवून घेणाऱ्या लोकांची प्रतिक्रया काय बरे असती...? विचार करा..?
कल्पना न केलेलीच बरी...
   म्हणजे स्वतःच्या घरातील कचरा राहिला बाजूला आणि दुसर्याच्या घरातील कचरा का साफ करत नाही..? असा बुद्दिभेदि सवाल मुद्दाम उपस्थित केला जात असे...जेनेकरुन ही विषमता अशीच चालू रहावी...आणि  अमानुष पुरुषप्रधान संस्कृतीचे उदात्तीकरण व्हावे...हां त्यामगाचा खटाटोप....
जी लोकं या लढ्याला विरोध करत होती तीच लोकं कालांतराने जेंव्हा हां मुद्दा पुन्हा केंव्हाही निघेल तेंव्हा पुन्हा दुट्टपीपणे अस बोलताना दिसतील की ' पहा...हां क्रांतिकारी निर्णय आमच्या सरकारच्या काळात झालाय...अमुक-तमुक पक्षाला जे जमले नाही ते आमच्या सरकारने केले...वगेरे वगेरे बाता मारून पुन्हा या लढ्याचे राजकिय श्रेयही लाटताना दिसतील...
पण मुळात हा लढा सामाजिक न्यायाचा आहे...
  डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या आणि अशाच सामाजिक न्यायासाठी मंदिरप्रवेशाची केलेली चळवळ असो वा सार्वजनिक पानवठे अस्पृश्य लोकांना खुले करण्यासाठी दिलेला लढा असो...त्यावेळीही याच पद्धतीने स्वतःला संस्कॄति रक्षक समजणाऱ्या लोकांनी या लढ्याला कडाडून विरोध केलेलाच होता...
पण शेवटी विजय सामाजिक न्यायाचा झाला...विजय सामाजिक समतेचा झाला...

हॅपी जनी॑

    प्रत्येकाने आपापल्या परीने समाजात लोकशाहीचा आधारस्तभ म्हणून यशस्वी प्रयत्न केला .त्यात आमचाही खारीचा वाटा या ध्येयाने प्रेरित होऊन आमचा हा अल्पसा प्रयत्न आणि म्हणून आम्ही एक वाचन साहित्य सुरु करीत आहोत.एक हक्काचे व्यासपीठ जे तुमच्या मनात ते आमच्या पानात प्रत्येक वेळी एक वेगळा विषय घेऊन.
     उन्हाळी सुट्टया लागल्या की प्रत्येक कुटुंबाला वेध लागते पय॑टनाचे त्यात एप्रिल, मे महिना खास आणि वेगवेगळ्या स्थळी फिरायला कोणाला आवडणार नाही साहजिकच अशा ठिकाणी जाण्यासाठी तिकीटे, हॉटेल, गाइड या सव॑ गोष्टीची गरज भासतेच आणि आपण तशी व्यवस्थाही करतो पण ऐनवेळी सहलीवर जायचे म्हटले तर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते.                           
    अशा वेळी 'एअर बीएनबी' ही व्यवस्था अतिशय फायदेशीर ठरते. इंटरनेटवर अतिशय लोकप्रिय झालेली ही संकल्पना आता तुम्हाला अॅपच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. या माध्यमातून तुम्ही कोणत्याही देशात, राज्यात, शहरात तुम्ही तुमच्या निवाराची व्यवस्था करू शकता त्यासाठी जास्त पैसे ही मोजावे लागणार नाहीत.                          
    औरंगाबाद पासून साधारण ३० कि.मी. असलेल्या वेरूळ या ठिकाणी हे मंदिर आहे. १२ ज्योतीर्लिंगांपैकी. घृष्णेश्वर हे १२ वे ज्योतीर्लिंग मानले जाते. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळतात. वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला. मित्रांनो तुम्ही कधी भेट दिली आहे का या स्थानाला?

वाचून विचार करा

प्रत्येकाने आपापल्या परीने समाजात लोकशाहीचा आधारस्तभ म्हणून यशस्वी प्रयत्न केला .त्यात आमचाही खारीचा वाटा या ध्येयाने प्रेरित होऊन आमचा हा अल्पसा प्रयत्न आणि म्हणून आम्ही एक वाचन साहित्य सुरु करीत आहोत.एक हक्काचे व्यासपीठ जे तुमच्या मनात ते आमच्या पानात प्रत्येक वेळी एक वेगळा विषय घेऊन.

"महाराष्ट्राची कुलस्वामिनी" तुळजाभवानी मंदिर पाचपाखाडी गणेशगल्ली ठाणे

        ठाणे शहर हे निसर्गसंपन्न, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे.ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग,...